AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : यशस्वी आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांचं मराठ्यांना महत्त्वाच आवाहन

Manoj Jarange Patil : "जीआर निघणं खूप आवश्यक होतं. 1881 साली एक ओळ मराठ्यांच्या हिताची सरकारने लिहिली नव्हती. स्वातंत्र्य मिळून 75-76 वर्ष झाली. पण मराठ्यांच्या हक्काच गॅझेटियर असून मराठ्यांसाठी एक ओळ नव्हती" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : यशस्वी आंदोलनानंतर मनोज जरांगे पाटील यांचं मराठ्यांना महत्त्वाच आवाहन
manoj jarange patil sad
| Updated on: Sep 03, 2025 | 12:22 PM
Share

“माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली. खूप प्रतिक्षा होती. अनेक शतकापासून शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात पाडून घेतलय. म्हणून सगळ्यात आधी महाराष्ट्रातल्या सगळया मराठ्यांना या काढलेल्या तिन्ही जीआरचं सर्व क्रेडिट समाजाला देतो. सगळं यश समाजाने मिळवलं. मी फक्त नाममात्र आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “मराठवाडा. पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवावा. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणर. यात तिळमात्र शंका नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत, म्हणून गॅझेटियर लागू करण गरजेच होतं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“जीआर निघणं खूप आवश्यक होतं. 1881 साली एक ओळ मराठ्यांच्या हिताची सरकारने लिहिली नव्हती. स्वातंत्र्य मिळून 75-76 वर्ष झाली. पण मराठ्यांच्या हक्काच गॅझेटियर असून मराठ्यांसाठी एक ओळ नव्हती” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “फक्त संयम, शांतता ठेवा. शांत डोक्याने विचार करा. एखादा विदूषक आणि अविचारी माणसावर विश्वास ठेऊन कधी आपण आपला संयम, विश्वास ढळू द्यायचा नाही” असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

‘आता त्यांच्या हातातून सर्व गेलं’

“निर्णय घेताना आम्ही दोघे निर्णय घेतो. निर्णय घेताना एकट घेत नाही. मी आणि माझी सात कोटी गोरगरीब जनता. बाकीच्या काहींच पोट यासाठी दुखतय की, आता त्यांच्या हातातून सर्व गेलं. त्यांना ज्या आरक्षणावर राजकारण करायचं होतं, ते कोलमडलय. मग, आता काय करायचं?. हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाहीत. ही आजची घटना नाही” असं मनोज जरांगे पाटील बोलले.

‘खूप टोळ्या उठणार आहेत’

“ज्यांच्या नोंदी नाहीत, त्यांच्यासाठी गॅझेटियर लावला आहे. मराठवाड्यात एकही मराठा आरक्षणाविना राहणार नाही. फक्त आनंदी राहा. कोणाचा ऐकून तुमचं, माझं भलं होणार नाही. खूप टोळ्या उठणार आहेत. आणखी सरकारच्या बाजूने बोलून नकारात्मकता पसरवायची आणि खुश करायचं” असं मनोज जरांगे पाटील बोलले.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.