AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडेंना झालेला ‘तो’ आजार नेमकं काय खाल्ल्याने होतो? लक्षणं काय? जाणून घ्या A टू Z माहिती

धनंजय मुंडे यांना झालेल्या दुर्मिळ बेल पॅल्सी आजाराची माहिती या लेखात आहे. चेहऱ्याच्या स्नायूंच्या कमकुवतीमुळे होणारा हा आजार तणाव, संसर्गाने किंवा मधुमेहामुळे होऊ शकतो.

धनंजय मुंडेंना झालेला 'तो' आजार नेमकं काय खाल्ल्याने होतो? लक्षणं काय? जाणून घ्या A टू Z माहिती
dhananjay munde Bells Palsy
| Updated on: Feb 20, 2025 | 7:35 PM
Share

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. सध्या त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. धनंजय मुंडेंना झालेला हा आजार नेमका काय? तो कशामुळे होतो? त्याची लक्षण काय? याबद्दलची माहिती समोर आली आहे.

बेल्स पाल्सी म्हणजे काय? (What is Bell’s Palsy)

बेल्स पाल्सी हा आजार झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. त्याच्या चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होतो. चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा किंवा अंशत: पक्षाघात होतो. यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते. यामुळे तुम्हाला पापणी नीट बंद करता येत नाही. तसेच तुम्हाला एक डोळा बंद करण्यात अडचणी येऊ शकतात. हसण्यासही त्रास होऊ शकतो. बेल्स पाल्सी हा फक्त प्रौढ व्यक्तींना किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींना होतो. योग्य औषधोपचार केल्यास २ ते ३ महिन्यानंतर आजाराची लक्षणे नाहीशी होतात.

बेल्स पाल्सीची लक्षणे काय?

  • चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी किंवा लकवा येणं
  • डोळे आणि तोंड व्यवस्थित बंद न करता येणे
  • बोलताना किंवा खाताना अडचण येणे
  • चेहऱ्यावर मुंग्या येणे किंवा सुन्न वाटणे
  • चव समजण्यास अडचणी
  • कानाजवळ वेदना
  • संवेदनशीलता वाढणे

बेल्स पाल्सी कशामुळे होतो?

बेल्स पाल्सी हा आजार जास्त तणाव किंवा मानसिक दडपणामुळे होऊ शकतो. अचानक थंडी लागणे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, या व्यक्तींनाही हा आजार होऊ शकतो. मधुमेह (डायबिटीज) किंवा इतर काही आरोग्य समस्या असलेल्यांनाही हा आजार होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे जेवणात मीठाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळेही हा आजार उद्भवू शकतो. मिठाचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. स्ट्रोक हे चेहऱ्यावर येणाऱ्या पक्षाघाताचे मुख्य कारण आहे.

उपचार काय?

  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणे घेणे
  • फिजिओथेरपी आणि चेहऱ्याशी संबंधित व्यायाम करणे
  • मालिश किंवा गरम पाण्याने शेक देणे
  • डोळे कोरडे पडू नयेत म्हणून आयड्रॉप वापरणे
  • बेल्स पाल्सी काही आठवड्यांत किंवा महिन्यात आपोआप बरी होते.
  • डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.