रेल्वेचा अपघात की घातपात? गुलाबराव पाटील यांचा दावा काय?; मृतांचा आकडा वाढणार

जळगावमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे, या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातावर आता गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

रेल्वेचा अपघात की घातपात? गुलाबराव पाटील यांचा दावा काय?; मृतांचा आकडा वाढणार
Follow us
| Updated on: Jan 22, 2025 | 8:42 PM

जळगावमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे, या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील? 

रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे कुणी तरी चैन ओढली. परिणामी गाडी फास्ट थांबली आणि चाकातून ठिणग्या उडाल्या. त्यामुळे आग लागल्याचं कन्फर्म झालं. त्यामुळे जनरल डब्यातील काही लोकांनी एका साईडला तर काहींनी दुसऱ्या साईडला उडी मारली. दुसऱ्या साईडने जे उतरले ते कर्नाटक एक्सप्रेसने उडवले. कर्नाटक एक्सप्रेस १३० ते १४० च्या स्पीडने येत होती. मी स्टेशन मास्तरला विचारलं, तर त्याने एक्सप्रेसचा वेग ताशी १३० ते १४० इतका असतो असं सांगितलं. त्यामुळे त्या ठिकाणी अपघात झाला. आणि ११ लोकांचा मृत्यू झाला. चौघांचे मृतदेह पाचोऱ्यात आहेत. तर ७ मृतदेह जळगावला पाठवले आहेत. कलेक्टर, एसपी आणि सर्व अधिकारी तिथे उपस्थित आहेत. मेडिकलचे सर्व अधिकारी तिथे उपस्थित आहेत.

चार लोकं गंभीर जखमी आहे. त्यांचं काय होईल हे सांगता येत नाही. वृंदावन नावाचं खासगी हॉस्पिटल आहे, तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. तर सात जण किरकोळ जखमी झाले आहेत.  गैरसमजुतीतून ही दुर्घटना झाली आहे. पण दुर्घटना इतकी भयानक आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. याची चौकशी होईल. पण केंद्र सरकारने मदत करावी ही विनंती करणार आहे. रक्षा खडसे यांनाही कळवलं की केंद्रतून मदत घ्यावी. वाहतूक क्लिअर झाली आहे. गाडी पाचोरा स्टेशनला आली आहे.

मी दोन मिनिटापूर्वी कलेक्टरशी बोललो. सर्व क्लिअर झालं आहे. घटनास्थळी काहीच राहिलेलं नाही. आग लागलीच नव्हती. फक्त अफवा होती. चैन ओढल्यानं चाकांमधून ठिणग्या उडाल्या. त्यामुळे आग लागल्याचं सर्वांनाच वाटलं. चार जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकाड 15 वर जाऊ शकतो.  यात तरी राजकारण करू नका. जा लोकांचा मृत्यू झाला त्यांचा विचार करा. हा घातपात नाही अपघातच आहे.  कलेक्टरचं म्हणणं आहे की गाडी सरळ जात होती. घातपाताचा विषय नाही. जनरल डब्यातील लोकं उतरले. एसी डब्यातील लोकं उतरले नाहीत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हलटं आहे.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.