AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार म्हणतात, मी मुख्यमंत्र्यांना घाम फोडतो…तर माझेच 100 आमदार असते

maharashtra assembly election 2024: गरिबांचे शिक्षण वेगळे झाले आणि शेतकऱ्यांचे पोर वेगळे झाले. या भागात पाणी पडते पण त्याचे पाणी दुसऱ्याकडे जाते. आतापर्यंत बोरसे यांच्यासारख्या लोकांना निवडणूक दिले. पण त्याचा काही फायदा नाही.

एकनाथ शिंदे समर्थक आमदार म्हणतात, मी मुख्यमंत्र्यांना घाम फोडतो...तर माझेच 100 आमदार असते
एकनाथ शिंदे
| Updated on: Nov 16, 2024 | 4:53 PM
Share

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानास अवघे काही दिवस राहिले आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीपूर्वी कधी एकत्र असलेले पक्ष आणि आमदार आता एकमेकांच्या विरोधात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार आणि प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. सटाणा येथील प्रचारसभेत बोलताना बच्चू कडू मुख्यमंत्र्याला घाम फोडून टाकतो, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच मी जर जातीचे राजकारण केले असते तर माझेच १०० आमदार निवडून आणले असते. परंतु मी शेतकरीच राजकारण करतो, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू म्हणाले, आताची राजकीय अवस्था अशी आहे की कुठल्याही पक्षाची सत्ता येणार नाही. माझ्या विरोधात काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिला आहे. परंतु आता आमचे शिवाय सरकार बनणार नाही. आमचा पक्ष लहान असला तरी काम त्या मोठ्या पक्षांपेक्षा मोठे आहे.

कांद्याने दिला झटका

बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना उद्देशून बच्चू कडू म्हणाले, येथे धमक्या दिल्या जातात. परंतु त्यांना माहीत नाही, आमच्या पक्षाचे नावच प्रहार आहे. त्यामुळे किमान धमक्या देऊ नका. खरं पाहिलं तर शेतकरी संकटात आहे. देशात सर्वात जास्त आत्महत्या शेतकरी आणि तरुण करत आहेत. स्वामिनाथन आयोग आम्ही स्वीकारला तेव्हा शरद पवार कृषिमंत्री होते. तेव्हापासून आतापर्यंत मोदींनी देखील शेतकऱ्यांच्या शेत पिकाला भाव दिला नाही. कुणीही हमीभाव दिला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्यात बंदी केली गेली होती. कांद्याविषयी कोणीही लोकसभेत बोलले नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांनी दणका दिला आणि भाजपचा खासदार पडला. आताही कांद्याला भाव नाही तर मत नाही अशी पाटी घरावर लावा.

गरिबांचे शिक्षण वेगळे झाले आणि शेतकऱ्यांचे पोर वेगळे झाले. या भागात पाणी पडते पण त्याचे पाणी दुसऱ्याकडे जाते. आतापर्यंत बोरसे यांच्यासारख्या लोकांना निवडणूक दिले. पण त्याचा काही फायदा नाही. शेतकरी म्हणून कोणीही नेता पुढे नेत नाहीत, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Follow Us
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.