AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“रामदास कदम गडी केवडा आणि ओरडतो केवढा”; ठाकरे गटाच्या नेत्यानं रामदास कदम यांची उडवली खिल्ली

शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, शिंदे गटातील गद्दार आमदारांनीच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असल्याची टीका त्यांच्यावर करणअयात आली.

रामदास कदम गडी केवडा आणि ओरडतो केवढा; ठाकरे गटाच्या नेत्यानं रामदास कदम यांची उडवली खिल्ली
| Updated on: Jan 16, 2023 | 10:08 PM
Share

रत्नागिरीः मला आणि माझ्या मुलाला संपवलं असं विधान रामदास कदम वारंवार करत असतात मात्र तुम्हाला कोण संपवतो असा थेट सवाल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.दापोली केळशीतील सभेवेळी भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या सभेत बोलताना रामदास कदम गडी केवढा आणि ओरडतो केवढा असा टोला लगावत त्यांची खिल्ली उवडवण्यात आली.

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज रामदास कदम यांच्यासह त्यांचा मुलावरही जोरदार हल्लाबोल केला. रामदास कदम यांची जीभ काळी आहे तर योगेश कदम यांच्या हातात काळा दोरा असल्याची टीका करत पिता पुत्रांची खिल्ली उडवली आहे.

भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका करताना कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचा गौरवही केला.

तर यावेळी भाजपवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे कोरोना काळात राज्य संकटात असताना भाजप मात्र त्यावेळचे ठाकरे सरकार पडणार असल्याची वक्तव्य तासा तासाला केली जात होती.

संकटकाळात विरोधक सत्ताधाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असतात तर आपल्या राज्यात मात्र संकटकाळात सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत होते अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटावर ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यावरूनच आजही आमदार भास्करराव जाधव यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला.

शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, शिंदे गटातील गद्दार आमदारांनीच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असल्याची टीका त्यांच्यावर करणअयात आली.

1966 पासून शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह देव्हाऱ्यात पुजले जात होते, मात्र 40 गद्दार शिवसेना सोडून गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आले होते अशी भाविनक गोष्टही त्यांनी सांगितली.

उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले खरे शिवसैनिक नाहीत तर गेलेले सर्व गद्दार आहेत. हे सांगण्यासाठीच मतदार संघात आलो आहे असंही भास्कर जाधव यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.