AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“रामदास कदम गडी केवडा आणि ओरडतो केवढा”; ठाकरे गटाच्या नेत्यानं रामदास कदम यांची उडवली खिल्ली

शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, शिंदे गटातील गद्दार आमदारांनीच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असल्याची टीका त्यांच्यावर करणअयात आली.

रामदास कदम गडी केवडा आणि ओरडतो केवढा; ठाकरे गटाच्या नेत्यानं रामदास कदम यांची उडवली खिल्ली
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 16, 2023 | 10:08 PM
Share

रत्नागिरीः मला आणि माझ्या मुलाला संपवलं असं विधान रामदास कदम वारंवार करत असतात मात्र तुम्हाला कोण संपवतो असा थेट सवाल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.दापोली केळशीतील सभेवेळी भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. या सभेत बोलताना रामदास कदम गडी केवढा आणि ओरडतो केवढा असा टोला लगावत त्यांची खिल्ली उवडवण्यात आली.

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आज रामदास कदम यांच्यासह त्यांचा मुलावरही जोरदार हल्लाबोल केला. रामदास कदम यांची जीभ काळी आहे तर योगेश कदम यांच्या हातात काळा दोरा असल्याची टीका करत पिता पुत्रांची खिल्ली उडवली आहे.

भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका करताना कोरोना काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाचा गौरवही केला.

तर यावेळी भाजपवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे कोरोना काळात राज्य संकटात असताना भाजप मात्र त्यावेळचे ठाकरे सरकार पडणार असल्याची वक्तव्य तासा तासाला केली जात होती.

संकटकाळात विरोधक सत्ताधाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असतात तर आपल्या राज्यात मात्र संकटकाळात सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत होते अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटावर ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यावरूनच आजही आमदार भास्करराव जाधव यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला.

शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, शिंदे गटातील गद्दार आमदारांनीच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असल्याची टीका त्यांच्यावर करणअयात आली.

1966 पासून शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह देव्हाऱ्यात पुजले जात होते, मात्र 40 गद्दार शिवसेना सोडून गेले तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आले होते अशी भाविनक गोष्टही त्यांनी सांगितली.

उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले खरे शिवसैनिक नाहीत तर गेलेले सर्व गद्दार आहेत. हे सांगण्यासाठीच मतदार संघात आलो आहे असंही भास्कर जाधव यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?