AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेतील गदारोळावरुन रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला टोला, रोहित पवार यांचं ट्विट काय ?

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेच्या गोंधळावरुन सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

विधानसभेतील गदारोळावरुन रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला टोला, रोहित पवार यांचं ट्विट काय ?
Image Credit source: Google
| Updated on: Dec 22, 2022 | 2:28 PM
Share

नागपूर : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून सभागृहाचे कामकाज अनेक वेळेला तहकूब करण्यात आले आहे. यामध्ये दिशा सालियानच्या मृत्यूची पुन्हा एकदा चौकशी करा अशी मागणी करण्यात आल्याने सभागृहात वारंवार गदारोळ झाल्याचे दिसून आले आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेचे सभागृहात अनेकदा तहकूब करण्याची वेळ आल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षावर ट्विट करत निशाणा साधला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारी आमदारच पायऱ्यांवर आंदोलन करताना आणि सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडताना दिसत आहे. हेच का ‘जनसामान्यांचं’ भरकटलेलं दिशाहीन सरकार? सत्ता चालवता येत नसल्याचे विरोधात जाण्याचीच ही त्यांची तयारी दिसतेय! अशा आशयाचे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले असून भाजपसह शिंदे गटाला हा चिमटा काढला आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांना थेट विरोधात जाण्याची तयारी असल्याचा मुद्दा नमूद करत सत्तांतराचा मुद्दा हाती घेतला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेच्या गोंधळावरुन सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारी आमदारच पायऱ्यांवर आंदोलन करताना आणि सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडताना दिसत आहे असे नमूद केले आहे.

राज्यातील प्रश्न सोडविण्यापेक्षा दिशा सालियानचा मुद्दा सरकार लावून धरत असल्याने हेच का ‘जनसामान्यांचं’ भरकटलेलं दिशाहीन सरकार? असा टोला लगावला आहे..

सत्ता चालवता येत नसल्याचे विरोधात जाण्याचीच ही त्यांची तयारी दिसतेय! असा चिमटा काढत रोहित पवार यांनी भाजपसह शिंदे गटाच्या आमदारांना टोला लगावला आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.