AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS Raj Thackeray | एका प्रश्नावर राज ठाकरे सरळ बोलले ‘घंटा’ अपेक्षा

MNS Raj Thackeray | राज ठाकरे यांना विचारलेला तो प्रश्न काय होता?. एक गट सत्तेत, तर दुसरा विरोधी पक्षात अशी स्थिती आहे. महाराष्ट्राच हे राजकारण अनेकांना पटलेलं नाही.

MNS Raj Thackeray | एका प्रश्नावर राज ठाकरे सरळ बोलले 'घंटा' अपेक्षा
raj thackeray
| Updated on: Jul 16, 2023 | 3:11 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती अनेकांना चक्रावून सोडणारी आहे. मागच्यावर्षी शिवसेना आणि काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. एक गट सत्तेत, तर दुसरा विरोधी पक्षात अशी स्थिती आहे. महाराष्ट्राच हे राजकारण अनेकांना पटलेलं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच या राजकीय स्थिती विरोधात आंदोलन सुरु आहे. त्यांनी एक सही संतापाची हे अभियान सुरु केलय. आज राज ठाकरे शिवाजी पार्क येथे एक सही संतापाची अभियानात सहभागी झाले होते.

त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रोख-ठोक भाष्य केलं. त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले.

‘प्रत्येक घरात संताप’

एक सही संतापाची या प्रश्नावर त्यांनी “हे तुम्हाला दिसतय ते प्रातिनिधीक आहे. तुम्ही घराघराचा कौल घेतला, तर प्रत्येक घरात संताप आहे. ज्या प्रकारच राजकारण महाराष्ट्रात झालं, ते संतापजनक, घाणेरड आहे. याआधी असं कधी घडलं नव्हतं, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवणारी ही घटना आहे” अशी टीका राज ठाकरे यांनी केली. असं उत्तर राज ठाकरेच देऊ शकतात

“सध्या ज्या तडजोडी सुरु आहेत, त्याचं मला आश्चर्य वाटत नाही. भांडतात एकत्र येतात. जे डॅमेज व्हायचय ते झालय. भविष्यातल्या पिढ्यांसाठी ज्यांना राजारणात यायचय त्यांच्या ताटात आपण काय वाढतोय. हे कोणत्या प्रकारच राजकारण आहे. हेच राजकारण असेल, तर महाराष्ट्राच राजकारण कुठे चाललय याचा आपण साधा विचार करतोय का? सत्ता आणि स्वार्थाच हे राजकारण घाणेरडं आहे” असं राज ठाकरे म्हणाले. पावसाळी अधिवेशनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी ‘घंटा’ असं उत्तर दिलं.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...