AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचे सूचक विधान, मनसे नेता म्हणाला…

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल सूचक विधान केले. राज्याच्या मनात आहे, तेच मी करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचे सूचक विधान, मनसे नेता म्हणाला...
Image Credit source: PTI
Updated on: Jun 20, 2025 | 8:25 AM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल सूचक विधान केले. राज्याच्या मनात आहे, तेच मी करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर शिवसेना मनसेच्या युतीबद्दलच्या चर्चांना अजूनच उधाण आले. आता यावर मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये मोठा सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबद्दल सूचक विधान केले. “बातम्या सुरू आहेत. काय होणार? कसलं? होणार का? होणार की नाही होणार, कळेल ना. राज्याच्या मनात आहे तेच मी करणार आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

“पण ते होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर गाठीभेटी घेऊ लागले. हॉटेलात भेटतात. मालकाचे नोकर तुम्ही, जर का मुंबईवर ताबा मिळाला नाही. मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आली . अरे आम्ही घेणारच आहोत. मराठी माणसाच्या ताब्यात मुंबई गेली तर मालकाचं कसं होणार. मालकाच्या मित्राचं कसं होणार म्हणून मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. म्हणून शेठजीचे नोकर,. आणि नालायकपणे वर्धापन दिन साजरा करणारे शेठजीच्या नोकरांचे नोकर आहेत. तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही पाहू”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

प्रकाश महाजन काय म्हणाले?

आता यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. याबद्दल माननीय पक्षप्रमुख राज ठाकरे भूमिका घेतील आणि स्पष्ट करतील. त्यामुळे मेळाव्यातून आणि पत्रकार परिषदेतून जो काही प्रतिसाद किंवा प्रस्ताव येतो तो प्रत्यक्षात जेव्हा राज ठाकरेंकडे जाईल, त्यावर राज ठाकरे निर्णय करतील. आता हे सांगणं खूपच घाईचं आणि लवकर होईल असं मला वाटतं, असे प्रकाश महाजन म्हणाले.

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.