AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचे सूचक विधान, मनसे नेता म्हणाला…

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल सूचक विधान केले. राज्याच्या मनात आहे, तेच मी करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचे सूचक विधान, मनसे नेता म्हणाला...
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 20, 2025 | 8:25 AM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल सूचक विधान केले. राज्याच्या मनात आहे, तेच मी करणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर शिवसेना मनसेच्या युतीबद्दलच्या चर्चांना अजूनच उधाण आले. आता यावर मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये मोठा सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबद्दल सूचक विधान केले. “बातम्या सुरू आहेत. काय होणार? कसलं? होणार का? होणार की नाही होणार, कळेल ना. राज्याच्या मनात आहे तेच मी करणार आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

“पण ते होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर गाठीभेटी घेऊ लागले. हॉटेलात भेटतात. मालकाचे नोकर तुम्ही, जर का मुंबईवर ताबा मिळाला नाही. मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आली . अरे आम्ही घेणारच आहोत. मराठी माणसाच्या ताब्यात मुंबई गेली तर मालकाचं कसं होणार. मालकाच्या मित्राचं कसं होणार म्हणून मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. म्हणून शेठजीचे नोकर,. आणि नालायकपणे वर्धापन दिन साजरा करणारे शेठजीच्या नोकरांचे नोकर आहेत. तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही पाहू”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

प्रकाश महाजन काय म्हणाले?

आता यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. याबद्दल माननीय पक्षप्रमुख राज ठाकरे भूमिका घेतील आणि स्पष्ट करतील. त्यामुळे मेळाव्यातून आणि पत्रकार परिषदेतून जो काही प्रतिसाद किंवा प्रस्ताव येतो तो प्रत्यक्षात जेव्हा राज ठाकरेंकडे जाईल, त्यावर राज ठाकरे निर्णय करतील. आता हे सांगणं खूपच घाईचं आणि लवकर होईल असं मला वाटतं, असे प्रकाश महाजन म्हणाले.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.