AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साहित्य संमेलन गीतामध्ये सावरकरांचा उल्लेख नसल्यामुळे मनसे आक्रमक, जोरदार घोषणाबाजी

सावरकरांचा गीतामध्ये उल्लेख नसल्याचे समोर आल्यामुळे मनसे कार्यलयात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. तसेच प्रायश्चित्त म्हणून संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मनसेने केलीय.

साहित्य संमेलन गीतामध्ये सावरकरांचा उल्लेख नसल्यामुळे मनसे आक्रमक, जोरदार घोषणाबाजी
SWATRAVIR SAWARKAR
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 9:01 PM
Share

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र संमेलनाच्या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख नसल्यामुळे वादाला तोंड फटले आहे. सावरकरांचा गीतामध्ये उल्लेख नसल्याचे समोर आल्यामुळे मनसे कार्यलयात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. तसेच प्रायश्चित्त म्हणून संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मनसेने केलीय.

संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव द्या

नाशिकमधील कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर या तारखांना होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर तर स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आहेत. या संमेलानासाठी गीत तयार करण्यात आले असून मिलिंद गांधी गीतकार तर संजय गीते यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. मात्र या गीतात सावरकर यांचा उल्लेख नसल्याने नाराजी व्यक्त केली जातेय. सावरकर नाशिकचे भूमीपुत्र असूनदेखील त्यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबतची नाराजी छगन भुजबळ यांना कळवणार असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रायश्चित्त म्हणून संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मनसेतर्फे भुजबळ यांच्याकडे केली जाणार आहे.

मी स्वतः सावरकरप्रेमी, मला सावरकरांबद्दल नितांत आदर

या वादाला तोंड फुटल्यानंतर गीतकार मिलिंद गांधी यांनी प्रतिक्रिया दिलीय. कविता आणि गीत लिहिताना थोडे स्वातंत्र्य घेतले जाते. त्यामुळे गाण्यामध्ये ‘स्वातंत्र्याचे सूर्य’ असा उल्लेख आहे. तो एकट्या सावरकरांसाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांच्या योगदानासाठीही आहे. मी स्वतः सावरकरप्रेमी आहे. मला सावरकरांबद्दल नितांत आदर आहे, असं गांधी यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

मोठी बातमी: टी20 संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे, न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

समीर वानखेडेंच्या कुटुंबीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला, सत्याचा विजय नक्की होईल- क्रांती रेडकर

ST Workers Strike | एकीकडे संपाची तीव्रता वाढली, दुसरीकडे कारवाईचा बडगा, तब्बल 376 एसटी कर्मचाऱ्यांचे निलबंन

(MNS protest against swatantryaveer Savarkar name not mentioned in nashik marathi literature festival)

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.