Monsoon : यंदा दणक्यात होणार मान्सूनचे आगमन, भारतीय हवामान खात्याचा 4 आठवड्याचा काय आहे अंदाज?

यंदा मान्सून समाधानकारक बरसणार असल्याचे यापूर्वीच भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर आता तो वेळे अगोदरच दाखल होणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्याचे अंदाज वर्तवले आहेत. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. 13 ते 19 मे च्या दरम्यान अंदमानच्या समुद्रावर पाऊस होऊ शकतो.

Monsoon : यंदा दणक्यात होणार मान्सूनचे आगमन, भारतीय हवामान खात्याचा 4 आठवड्याचा काय आहे अंदाज?
पावसाची खबरबातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 2:56 PM

मुंबई : ज्या मान्सूनवरच देशातील शेती अवलंबून आहे त्या (Monsoon) मान्सूनचे यंदा कधी नव्हे ते वेळेअगोदरच आगमन होणार आहे. मे महिन्याच्या पंधरवाड्यानंतर प्रत्येकाला उत्सुकता असते ती मान्सूनचे आगमन केव्हा होणार याची. यंदा (Kharif Season) खरीप हंगामाच्या अनुशंगाने मान्सूनचे आगमन केव्हा होणार हे महत्वाचे आहे. शिवाय आगमनाबाबत तर्क-वितर्क लावले जात असतानाच (IMD) भारतीय हवामान विभागाने दिलासा दिला आहे. यंदा मान्सूनचे आगमन हे वेळेपूर्वीच होणार आहे. आठवड्याभरात आंदमानमध्ये मान्सून धडकणार असल्याचे सांगितले आहे. तर तळकोकणात देखील 27 मे ते 2 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे.

चार आठवड्याच्या अंदाजामध्ये काय दडलंय?

यंदा मान्सून समाधानकारक बरसणार असल्याचे यापूर्वीच भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर आता तो वेळे अगोदरच दाखल होणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार आठवड्याचे अंदाज वर्तवले आहेत. यामध्ये ही माहिती समोर आली आहे. 13 ते 19 मे च्या दरम्यान अंदमानच्या समुद्रावर पाऊस होऊ शकतो. तर आंदमनात मान्सून हा 22 मे पर्यंत दाखल होत असतो मात्र, तो देखील आता वेळीपूर्वीच येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. तर केरळात 20 ते 26 मे दरम्यान तो सक्रीय होईल असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

15 मे रोजी चित्र स्पष्ट होणार

भारतीय हवामान विभागाने 4 आठवडे कसे राहतील याबाबत अंदाज वर्तवला आहे. यामध्ये मान्सूनचे आगमन तर वेळेपूर्वीच होणार हे स्पष्ट झालं आहे पण राज्यात केव्हा मान्सून दाखल होणार याची माहिती ही 15 मे रोजी दिली जाणार आहे. तळकोकणात आणि मुंबईच्या काही भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होणार असल्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

खरीप हंगामासाठी पोषक वातावरण

सध्या शेतकऱ्यांना खरिपाची लगबग लागली असून शेतजमिनी मशागतीची कामे सुरु आहेत. वेळेत पाऊस झाला तर उत्पादनात वाढ होणार आहे. शिवाय परतीच्या पावसाचा धोका राहणार नाही. गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी तत्पर झाला असून पावसाने जर साथ दिली तर उत्पादनात वाढ होणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.