AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: राजू शेट्टी मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर मोर्चा काढणार

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाईल. | Raju Shetty

मोठी बातमी: राजू शेट्टी मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर मोर्चा काढणार
| Updated on: Dec 16, 2020 | 3:53 PM
Share

पुणे: मोदी सरकारचे कृषी कायदे हे अंबानी (Mukesh Ambani) यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत. मुकेश अंबानी यांची भूक वाढली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयके (Farm laws) लादली जात असल्याचा आरोप खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केला. (Raju Shetty march on Mukesh Ambani office in Mumbai)

राजू शेट्टी यांनी बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर 22 तारखेला मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाईल. या मोर्चात बच्चू कडू आणि बाबा आढाव यांच्या संघटनांचाही सहभाग असणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.

मोदी सरकारने शेतकऱ्यांवर कृषी कायदे जबरदस्तीने लादले

शेतकऱ्यांनी ज्या कायद्यांची मागणीच केली नाही ते कायदे शेतकऱ्यांवर लादण्यात आले. सरकारला शेतकऱ्यांना काही द्यायचंच असेल तर हमीभाव द्या. दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. यावरून शेतकऱ्यांच्या मागण्या सर्वोच्च न्यायालयाला मान्य असल्याचे दिसत आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी संघटना एकत्र असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा 21 वा दिवस

दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. आज या आंदोलनाचा 21 वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमेवरून शेतकऱ्यांना हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली. या नोटीसवर आता केंद्र सरकार काय स्पष्टीकरण देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या:

‘कृषी कायद्यांसारख्या कठोर सुधारणा रेटण्यासाठीच जनतेने मोदींना बहुमत दिलेय’

नारी शक्तीने शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली, 2000 पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- गडकरी

(Raju Shetty march on Mukesh Ambani office in Mumbai)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.