AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीतील फुटीला कोण जबाबदार? अखेर सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्या पुण्यात बोलत होत्या.

राष्ट्रवादीतील फुटीला कोण जबाबदार? अखेर सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 08, 2024 | 5:59 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात परिवर्तन येईल का नाही, तर परिवर्तन आणावंच लागेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या वर्षी राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. अजित पवार यांनी काही आमदारांंना सोबत घेऊन भाजपला पाठिंबा दिला. त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं. यावर आता पुन्हा एकदा प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात परिवर्तन येईल का नाही, तर परिवर्तन आणावंच लागेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. घरात मतभेद होण्यामागे कोण आहे? तर यामागे दिल्लीची अदृश्य शक्ती आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आमच्या घरातील महिलांना पण या प्रकरणात ओढण्यात आलं. कारण नसताना माझ्या बहिणीविरोधात रेड टाकण्यात आली.  आज आम्ही संविधान हातात घेतलं तरी दडपशाही केली जाते. कितीही दडपशाही केली तरी आम्ही संविधानाचा आवाज बुलंद करू, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

पटोलेंचा हल्लाबोल 

दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप हा शिकारी पक्ष आहे, तो आधी एखाद्या पक्षाला पकडून चांगलं खावू  पिवू घालतो. ते पाहून इतर पक्ष जवळ आले की त्यांना संपून टाकतो असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर बोलण्याची मुभा त्यांच्या खासदारांना नाही. भाजपमध्ये दोनच लोक पक्ष चालवतात.  भाजप कार्यकर्त्यांवर कसा अन्याय करतो, हे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांना सांगू द्या. भारत जलाव पार्टी म्हणजे भाजपा, असा हल्लाबोलही यावेळी नाना पटोले यांनी केला आहे. ते लातूरमध्ये बोलत होते.

Follow Us
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ.
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?.
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती.
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी.....
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.