AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीतील फुटीला कोण जबाबदार? अखेर सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्या पुण्यात बोलत होत्या.

राष्ट्रवादीतील फुटीला कोण जबाबदार? अखेर सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 08, 2024 | 5:59 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात परिवर्तन येईल का नाही, तर परिवर्तन आणावंच लागेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या वर्षी राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. अजित पवार यांनी काही आमदारांंना सोबत घेऊन भाजपला पाठिंबा दिला. त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं. यावर आता पुन्हा एकदा प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात परिवर्तन येईल का नाही, तर परिवर्तन आणावंच लागेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. घरात मतभेद होण्यामागे कोण आहे? तर यामागे दिल्लीची अदृश्य शक्ती आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आमच्या घरातील महिलांना पण या प्रकरणात ओढण्यात आलं. कारण नसताना माझ्या बहिणीविरोधात रेड टाकण्यात आली.  आज आम्ही संविधान हातात घेतलं तरी दडपशाही केली जाते. कितीही दडपशाही केली तरी आम्ही संविधानाचा आवाज बुलंद करू, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

पटोलेंचा हल्लाबोल 

दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप हा शिकारी पक्ष आहे, तो आधी एखाद्या पक्षाला पकडून चांगलं खावू  पिवू घालतो. ते पाहून इतर पक्ष जवळ आले की त्यांना संपून टाकतो असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर बोलण्याची मुभा त्यांच्या खासदारांना नाही. भाजपमध्ये दोनच लोक पक्ष चालवतात.  भाजप कार्यकर्त्यांवर कसा अन्याय करतो, हे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांना सांगू द्या. भारत जलाव पार्टी म्हणजे भाजपा, असा हल्लाबोलही यावेळी नाना पटोले यांनी केला आहे. ते लातूरमध्ये बोलत होते.

Follow Us
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
Pratap Sarnaik | ऑपरेशन टायगरबाबत मोठा गौप्यस्फोट, 24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या..
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या आधीच... अकोल्यात घडलं असं काही की...