AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीतील फुटीला कोण जबाबदार? अखेर सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्या पुण्यात बोलत होत्या.

राष्ट्रवादीतील फुटीला कोण जबाबदार? अखेर सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 08, 2024 | 5:59 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात परिवर्तन येईल का नाही, तर परिवर्तन आणावंच लागेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या वर्षी राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. अजित पवार यांनी काही आमदारांंना सोबत घेऊन भाजपला पाठिंबा दिला. त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं. यावर आता पुन्हा एकदा प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात परिवर्तन येईल का नाही, तर परिवर्तन आणावंच लागेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. घरात मतभेद होण्यामागे कोण आहे? तर यामागे दिल्लीची अदृश्य शक्ती आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आमच्या घरातील महिलांना पण या प्रकरणात ओढण्यात आलं. कारण नसताना माझ्या बहिणीविरोधात रेड टाकण्यात आली.  आज आम्ही संविधान हातात घेतलं तरी दडपशाही केली जाते. कितीही दडपशाही केली तरी आम्ही संविधानाचा आवाज बुलंद करू, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

पटोलेंचा हल्लाबोल 

दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप हा शिकारी पक्ष आहे, तो आधी एखाद्या पक्षाला पकडून चांगलं खावू  पिवू घालतो. ते पाहून इतर पक्ष जवळ आले की त्यांना संपून टाकतो असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर बोलण्याची मुभा त्यांच्या खासदारांना नाही. भाजपमध्ये दोनच लोक पक्ष चालवतात.  भाजप कार्यकर्त्यांवर कसा अन्याय करतो, हे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांना सांगू द्या. भारत जलाव पार्टी म्हणजे भाजपा, असा हल्लाबोलही यावेळी नाना पटोले यांनी केला आहे. ते लातूरमध्ये बोलत होते.

शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.