‘मंत्रिपद गेल्यानंतर बावनकुळेंचा अभ्यास कच्चा झाला’, विनायक राऊतांचा टोला

वीज कंपन्यांची थकबाकी आजही वसूल झालेली नाही. ती तशीच आहे, असेही राऊतांनी सांगितले. (Vinayak raut Criticized Chandrashekhar Bawankule) 

'मंत्रिपद गेल्यानंतर बावनकुळेंचा अभ्यास कच्चा झाला', विनायक राऊतांचा टोला
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 9:45 PM

मुंबई : “माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर त्यांचा अभ्यास कच्चा झाला आहे,” असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लगावला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील वीज कंपन्यांची थकबाकी आजही वसूल झालेली नाही. ती तशीच आहे, असेही राऊतांनी सांगितले. (Vinayak raut Criticized Chandrashekhar Bawankule)

“चंद्रशेखर बावनकुळे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर अभ्यास कच्चा झाला आहे. गेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील वीज कंपन्यांची थकबाकी आजही वसूल झालेली नाही. ती तशीच आहे. त्यात कोरोनाच्या संकटात महाविकासआघाडी सरकारवर ओझं पडलं आहे. त्यामुळे दुर्देवाने वीजबिल थकबाकी वसूल करण्याशिवाय काहीही शिल्लक राहिलेलं नाही,” असे विनायक राऊत म्हणाले.

“यांना मी एवढच सांगू इच्छितो की, महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे 25 हजार कोटी आणि एनडीआरएफचा नुकसानभरपाईचा निधी अद्याप केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेला नाही. यासाठी बावनकुळेंनी दिल्लीत उपोषण करावं. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र आहात हे सिद्ध होईल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

कर्नाटकचा जो कोणी मंत्री आहे. त्याची अक्कल गुडघ्यात आहे असं दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचं शौर्य हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू नये. खऱ्या अर्थाने कर्नाटकचे सरकारच्या सीमावादाबद्दलचा जो अतिरेक चालला आहे. त्यामुळे मी पंतप्रधानांकडे मागणी केले की बेळगाव सीमावाद प्रश्न पंतप्रधानांनी हा भाग केंद्रशासित करावा. असे विनायक राऊतांनी सांगितले.

महाराष्ट्र-बेळगाव सीमा वादप्रकरणी बेळगावला केंद्रशासित राज्य करावा: विनायक राऊत

मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारनं राज्य सरकार सोबत चर्चा करावी. स्थगिती उठविण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडावी. महाराष्ट्र-बेळगाव सीमा वादप्रकरणी बेळगावला केंद्रशासित राज्य करावा, अशी मागणी विनायक राऊतांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वपक्षीय बैठकीत कृषी कायद्यांवर चर्चा झाली. (Vinayak raut Criticized Chandrashekhar Bawankule)

संबंधित बातम्या : 

मुलाच्या चौकशीनंतर किरीट सोमय्या आक्रमक, कथित जमीन घोटाळा प्रकरणात कर्जत तहसीलदारला भेटणार

वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल, अजित पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन 

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.