AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाटून आलेले ढग, दिवसाही अंधार आणि पावसाची संततधार.. मुंबईत परिस्थिती काय ?

मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रेल्वे वाहतूक उशीराने सुरू आहे. अनेक परिसरात जोरदार पाऊस पडला. हवामान खात्याने पुढील दोन तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, पालघरला येलो अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

दाटून आलेले ढग, दिवसाही अंधार आणि पावसाची संततधार.. मुंबईत परिस्थिती काय  ?
मुंबई पाऊसImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 26, 2025 | 9:13 AM
Share

केरळमध्ये मान्सूनचे आगमन होताच आता राज्यातही मान्सून आला असून मे महिन्यातच राज्यभरात सर्वत्र पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मुंबईसह उपनगरांमध्येही आज पहाटेपासूनच पावसाचा जोर दिसून आला आहे. अद्याप जूनचा पहिला आठवडाही आलेला नसतानाच पावसाने सर्वत्र लवकर हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. मुंबईत पहाटेपासून पडणाऱ्या पावसाचा परिणा रेल्वे सेवेवरही दिसून येत असून मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरू आहे. हिंदमाता, दादर, परळ परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

आज पहाटेपासून ढग दाटून आल्याने काळोखलेलं वातावरण असून मुंबईकरांना अद्याप सूर्याचे दर्शन झालेलं नाही. संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण असून शहरांसह उपनगरांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५०-६० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईत सकाळी 6 वाजल्यापासून सात वाजेपर्यंत पावसाची झालेली नोंद

नरिमन पॉईंट – 40 मिमी

ग्रॅण्ट रोड – 36 मिमी

कुलाबा – 31 मिमी

भायखळा – 21 मिमी

मुंबई शहरात गेल्या 24 तासात 58 मिमी इतक्या पावसाची नोंद

पूर्व उपनगरात 19 मिमी पावसाची नोंद

पश्चिम उपनगरात 15 मिमी पावसाची नोंद

सध्याची परिस्थिती पाहता, मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाचा जोर सुरू आहे. काळे ढग आणि मुसळधार पावसामुळे काही वेळातच जलभरतीची शक्यता नाकारता येत नाही.

महत्वाची माहिती :

अद्याप कोणत्याही भागात पाणी साचलेले नाही.

पावसाचा जोर असाच टिकून राहिल्यास अंधेरी सबवे, मालाड सबवे, दहिसर सबवे या सर्व ठिकाणी पाणी भरू शकते.

या भागांतून प्रवास करत असाल तर पर्यायी मार्गाचा वापर करा. अधिकृत हवामान खात्याच्या सूचना तपासत राहा. दुचाकी किंवा पादचारी मार्गांनी अनावश्यक प्रवास टाळा अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

पुढील 3 दिवस कुठे-कुठे ऑरेंज अलर्ट ?

पुढील 3 दिवस मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गला ऑरेंज’ इशारा आहे. मात्र 29 मेनंतर पावसाचा जोर मंदावेल, असा अंदाज व्यक्त होतोय. दरवर्षी प्रतीक्षा असलेला मान्सून रविवारी तळकोकणात दाखल झाला. हवामान खात्याच्या अहवालानुसार मोसमी पाऊस म्हणजेच मान्सूनची उत्तर सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडपर्यंत पोहोचली आहे. हा मान्सून येत्या तीन दिवसांत मुंबईत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मान्सून तळकोकणात पोहोचल्यानंतर आता तो मध्य अरबी समुद्रासह मुंबईत पोहोचण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. त्यानुसार मोसमी पाऊस पुढील तीन दिवसांत मुंबईत दाखल होईल. त्यादरम्यान मान्सून संपूर्ण कर्नाटकसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज आहे. पुढील आठवड्यात कोकणात सर्वत्र पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबई शहर व उपनगरात पुढील दोन दिवस आकाश पूर्ण वेळ ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.