AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain : मुंबईत पहाटेच पावसाची हजेरी, गारव्यामुळे नागरिक सुखावले

गेल्या काही दिवसांपासून लपंडाव खेळणाऱ्या पावसाने अखेर आज (बुधवारी) सकाळी मुंबईत हजेरी लावल्याचे दिसत आहे.मंगळवारी रात्री मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पावसाच्या काही मुसळधार सरी कोसळल्या. तर बुधवार पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली.

Mumbai Rain : मुंबईत पहाटेच पावसाची हजेरी, गारव्यामुळे नागरिक सुखावले
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Jun 19, 2024 | 9:14 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून लपंडाव खेळणाऱ्या पावसाने अखेर आज (बुधवारी) सकाळी मुंबईत हजेरी लावल्याचे दिसत आहे.मंगळवारी रात्री मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पावसाच्या काही मुसळधार सरी कोसळल्या, तसेच रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच आहे. मात्र बुधवार पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. वरळी, दादर माटुंगा या परिसरासह उपनगरातही पावसाने हजेरी लावली आणि वातावरणात गारवा आला. त्यामुळे उकाडा, घामामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. बोरिवली, गोरेगाव, अंधेरीसह वांद्रे परिसरातही जोरदार पाऊस झाला.

दादर माटुंगा परिसरात सकाळी 7 वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरवात झाली असून आज दिवसभर मुंबईतील वातावरण ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकण पट्ट्यात आज मुसळधार पाऊस होऊ शकतो. येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे वरळी व तसेच दादर या सखल भागात पाणीदेखील साचल्याचे चित्र पाहायला मिळालं. पुन्हा एकदा नालेसफाई वरती प्रश्नचिन्ह सध्या उभे राहत आहे. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो. पावासमुळे रेल्वे सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता असून मुंबईकरांच्या मनात ती धास्तीही असतेच. सध्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि ढगांचा गडगडाट सुरु आहे. त्यामुळे आज मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

पेरण्या खोळंबल्या

दरम्यान राज्यात पावसाने आठवडाभरापासून ओढ दिल्याने तापमानात वाढ होऊन पुन्हा उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. १८ जून अखेर राज्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ५.६९ टक्के पेरण्या झाल्या असून, पावसाने अल्पविश्रांती घेतल्याने शेतकरी पेरण्यांबाबत संभ्रमात आहेत. मागील पाच वर्षांची सरासरी पाहता, १८ जूनअखेर राज्यात सरासरी १,४२,०२,३१८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. यंदा १८ जूनअखेर राज्यात जेमतेम ५.६९ टक्के म्हणजे ८,०८,७९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

विभागनिहाय पेरणीचा विचार करता, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत सर्वांधिक सरासरीच्या तुलनेत ११.५५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्या खालोखाल नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये सरासरीच्या तुलनेत ११.४२ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडलेल्या कोकण विभागात जेमतेम १.६६ टक्के, पावसाने ओढ दिलेल्या नागपूर विभागात ०.०८ टक्के, अमरावती विभागात ३.४९ टक्के, लातूर विभागात ५.१९ टक्के, कोल्हापूर विभागात ६.३२ टक्के आणि पुणे विभागात २.२० टक्के पेरण्या झाल्या आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली