Mumbai Rains News LIVE Updates : पावसाचा जोरदार तडाखा, कुठे झाडं उन्मळून पडतायेत, तर कुठे रस्त्यांना पाण्याचं स्वरुप… जनजीवन विस्कळीत
Mumbai Rains News LIVE Updates In Marathi : गेल्या 4 - 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहे. आज देखील हवामान विभागाने अनेक ठिकाणी रेड अर्लट जारी केलाय. राज्यातील महत्वाच्या घडामोडी, पावसाचे अपडेटस, क्रीडा, मनोरंज, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES
-
रायगडमध्ये पुराचा हाहाकार, 4 नद्यांनी ओलांडली धोकादायक पातळी
रायगडमध्ये पुराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील 4 नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. या पावसामुळे रायगडकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे.
-
विधानसभेच्या कामकाजासाठी आमदार भर पावसात सभागृहात
मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे विमान प्रवासात अडचणी झाल्यातरी विधानसभेचे कामकाजावर परिणाम होणार नाही. राज्यातील अनेक आमदार विमानतळावरून थेट विधानसभेत पोहोचू शकतात. त्यामुळे उपस्थितीत मोठी अडचण येणार नसल्याचे बोलले जात आहे. विधानसभेच्या कामकाजासाठी अनेक आमदारांचे प्रश्न सूचीबद्ध आहेत, तसेच संबंधित कामेही महत्त्वाचे आहेत.
-
-
बदलापुरात उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी
बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी 17.50 मीटरवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. यामुळे 12 हजार लोकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
-
मुसळधार पावसाचा कहर, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा ठप्प झाला आहे. मागील पाच तासांपासून हा मार्ग ठप्प झाला आहे. अंबा नदीचं पाणी महामार्गावर आल्याने हा मार्ग ठप्प झालाय. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली आहे.
-
आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ
आळंदीत जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे आळंदीतील इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीजवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
-
-
मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला मोठा फटका; मुंबई–पुणे संपर्क खंडित
मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला मोठा फटका; मुंबई–पुणे संपर्क खंडित, तर अप डाऊन मार्गावरील लोकल सेवा देखील 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी जमली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे हजारो प्रवाशांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी, चौकशी कक्षांवर वर्दळ वाढली आहे.
-
वारणा खोऱ्यात पावसाची संततधार सुरूच… अनेक छोटे बंधारे गेले पाण्याखाली
सांगलीच्या वाळवा तालुक्यासह वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चिकुर्डे येथील वारणा नदीवरील छोटा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तर सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील मुख्य पुलाला पाणी अगदी घासून वाहत असल्याने या भागातील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.
-
-
लोणावळ्यात विक्रमी पाऊस.. 24 तासांत तब्बल 625 मिमी पावसाची नोंद
पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 625 मिलीमीटर पाऊस बरसलाय. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झालीये. मात्र यावर्षी आत्तापर्यंत 1715 मिलीमीटर पाऊस झालाय. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत तब्बल 2502 मिलीमीटर इतका पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे दडी मारलेल्या पावसाने जोरदार परसात 24 तासांमध्ये मागील सर्व विक्रम मोडले आहे.
राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरु असल्यामुळे अनेक ठिकाणी गुडघ्यांपर्यंत पाणी साचलं आहे. तर अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेला देखील बसला आहे. मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. मागील 5 तासांपासून मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरती पाणी साचलं आहे. मुंबई गोवा महामार्ग नागोठणे जवळील वाकण या ठिकाणी ठप्प झाला आहे… अंबा नदीचे पाणी थेट आता मुंबई गोवा महामार्गावर आले आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, नागरिकांना बाहेर न पडण्याचं देखील आवाहन केलं आहे.. तर या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या, कुठे कशी परिस्थिती आहे…
Published On - Jul 06,2026 10:15 AM
