AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांवर सर्वात मोठं संकट, पाऊस पडला नाही तर पुढच्या महिन्यात भीषण पाणी टंचाई, धरणातील साठा किती?

मुंबईत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून, मान्सूनच्या विलंबाने चिंता वाढवली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ 12.12% पाणीसाठा शिल्लक आहे, जो फक्त महिनाभर पुरेल. 10% पाणीकपात लागू असूनही परिस्थिती गंभीर आहे. समाधानकारक पाऊस न पडल्यास मुंबईकरांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.

मुंबईकरांवर सर्वात मोठं संकट, पाऊस पडला नाही तर पुढच्या महिन्यात भीषण पाणी टंचाई, धरणातील साठा किती?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाची स्थिती
| Updated on: Jun 12, 2026 | 9:43 AM
Share

जून महिन्याचे 10 दिवस उलटून गेले असले तरीही पावसाचा मागमूस नाहीये. मान्सूनचं आगमन कधी होणार याकतडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. वाढत्या उन्हाच्या चटक्यांमुळे महाराष्ट्रातील नागिरक त्र्स झाले असून मुंबईकरांच्या घामाच्या धारा वहात आहेत. याच दरम्यान मुंबईकरांसाठी एक महत्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील पाणीसाठा 12.12% वर आला आहे. पाणीकपात असूनही फक्त महिनाभराचा साठा उरल्याचे समजते. मुंबईला सात तलावांमधून पाणी पुरवठा होतो खरा, मात्र सध्या या सात तलावांमधील उपयुक्त पाणीसाठा गुरुवारी (11 जून) सकाळी केवळ 1,75,465 दशलक्ष लिटर (12.12%) इतकाच शिल्लक राहिल्याची माहिती समोर आली. 15 मेपासूनच पालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू केली होती, ती अद्याप कायम असून समाधानकारक पाऊस पडेपर्यंत ही कपात सुरूच राहणार आहे. मात्र वेळेत पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना संकटाचा सामना करावा लागू शकतो.

सात तलावांमध्ये साठा किती ?

मुंबईतील सात तलावांमध्ये फक्त 12.12% पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण उपलब्ध साठा 1.75 लाख दशलक्ष लिटर आहे. भातसा तलावात सर्वाधिक 43.36%, तर अप्पर वैतरणामध्ये उपयुक्त साठा शून्य टक्क्यांवर पोहोचला आहे. खरंतर पाणीसाठा कमी होत असल्याचे दिसल्यावरच 15 मे पासून पालिकेने मुंबईत पाणीकपात लागू केली. मात्र आत जोपर्यंत समाधानकारक पाऊस पुडून पुरेसा पाणीसाठी होत नाही तोपर्यंत ही कपात लागूच राहील असे सांगण्यात आले आहे. मे महिन्यात पालिकेने सांगितले होते की 10% पाणी कपात केल्यास उपलब्ध पाणीसाठा 17 ऑगस्टपर्यंत पुरू शकतो; कपात नसती तर साठा 6 जुलैपर्यंतच टिकला असता.

तलावनिहाय स्थिती काय ?

11 जूनपर्यंत तलावनिहाय स्थिती काय आहे, ते जाणून घेऊया.

भातसा – 43.36%

मोडक सागर – 32.44%

तुळशी – 24.66%

मध्य वैतरणा – 14.48%

विहार – 11.33%

तानसा – 7.15%

अप्पर वैतरणा – 0% साठा (उपयुक्त साठा नाही)

मान्सून मुंबईत दाखल झाला असला तरी धरणक्षेत्रात अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्यास पाणीपुरवठ्यावरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या पालिकेची सर्व भिस्त धरणक्षेत्रातील पावसावर आहे.

पाऊस आला तरी ‘मिठी’ गाळातच

पावसाळा आता तोंडावर आला असला तरी मिठी नदी अजून गाळातच असल्याचे उघड झाले आहे. नदीसफाई केवळ 82.93 टक्के पूर्ण झाली आहे. मिठी नदीतील गाळ उपसण्याची अंतिम मुदत ही 10 जून होती, ती उलटून गेली असली, तरी अद्याप नदीची सफाई अपूर्णच राहिल्याचे समोर आले आहे. मिठी नदीची केवळ 82.93 टक्केच सफाई पूर्ण होऊ शकली आहे. एकीकडे मान्सून तोंडावर असताना नदीपात्रात शिल्लक राहिलेल्या या गाळामुळे लगतच्या सखल परिसरामध्ये पुरस्थिती निर्माण होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. पूर्वउपनगर-525 या विभागात केवळ75.99 टक्के काम झाले आहे. म्हणजेच या भागात अद्याप सुमारे 24 टक्के गाळ नदीपात्रातच पडून आहे. याशिवाय पूर्व जयनगर-526 विभागात 88.19 टक्के आणि पूर्व उपनगर-527 विभागात 84.20 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत