AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंच्या वरळीत दिशा पटानीच्या चित्रपटाचं शुटिंग; मनसेच्या नेत्याने घेतला आक्षेप

अभिनेत्री दिशा पटानी हिच्याशी असलेली आदित्य ठाकरे यांची मैत्री हा तर विशेष चर्चेचा विषय आहे. | Disha Patani aditya thackeray

आदित्य ठाकरेंच्या वरळीत दिशा पटानीच्या चित्रपटाचं शुटिंग; मनसेच्या नेत्याने घेतला आक्षेप
आदित्य ठाकरे यांची बॉलीवूमधील अनेक कलाकारांशी चांगली मैत्री आहे. अभिनेत्री दिशा पटानी हिच्याशी असलेली आदित्य ठाकरे यांची मैत्री हा तर विशेष चर्चेचा विषय आहे.
| Updated on: Mar 07, 2021 | 10:58 AM
Share

मुंबई: राज्य सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांचे वरळीत सर्रासपणे उल्लंघन होत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. वरळी हा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे ‘मनसे’कडून वरळीत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. (John Abraham and Disha Patani spotted in Mumbai shooting for Ek Villain Returns)

अशातच आता एका बॉलीवूड चित्रपटाच्या शुटिंगवेळी वरळी कोळीवाड्यात कोरोनाच्या नियमांना मूठमाती देण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. या शुटिंगसाठी अभिनेता जॉन अब्राहम आणि दिशा पटानी (Disha Patani) वरळी कोळीवाड्यात आले होते. या सर्व कलाकारांनी मास्क न घातल्याचा आरोप, मनसेचे नेते संतोष धुरी यांनी केला.

आदित्य ठाकरे यांची बॉलीवूमधील अनेक कलाकारांशी चांगली मैत्री आहे. अभिनेत्री दिशा पटानी हिच्याशी असलेली आदित्य ठाकरे यांची मैत्री हा तर विशेष चर्चेचा विषय आहे. मध्यंतरी आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी एकत्र डिनरलाही गेले होते. यावरुन तेव्हा बऱ्याच चर्चाही रंगल्या होत्या. त्यामुळे आता वरळी कोळीवाड्यातील दिशा पटानीच्या चित्रपटाचे शुटिंग हा विषय चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

कलाकारांनी मास्क घातले नाहीत, मनसेचा आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) काही व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. मनसेचे नेते संतोष धुरी यांच्या दाव्यानुसार, वरळी कोळीवाड्यात शुक्रवारी रात्री उशीरा एका चित्रपटाचे शुटिंग सुरु होते. यावेळी जॉन अब्राहम आणि दिशा पटानी त्याठिकाणी उपस्थित होते. मात्र, एकाही कलाकाराने तोंडावर मास्क घातला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नव्हते, असे संतोष धुरी यांनी सांगितले.

वरळीतील पब आणि बारवर कारवाई करणार, आदित्य ठाकरेंची घोषणा

काही दिवसांपूर्वी वरळीतील नाईट क्लबमध्ये तुफान गर्दीमध्ये कोरोनाचे सर्व नियम धुडकावत जोरदार पार्टीच आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. हा मुद्दाही ‘मनसेने’च उजेडात आणला होता. त्यानंतर विधानसभेत यावरुन बराच गदारोळही झाला होता. या सगळ्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या नाईट क्लबवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते.

वरळीतील प्रकारावर देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाईट लाईफ आणि कोरोना निर्बंधांवरुन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असून तिथं त्यांचेच चालते. आदित्य ठाकरेंनी सांगितल्यानं पब आणि बार बिनधास्त सुरु असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोना हा फक्त शिवजयंती आणि अधिवेशनाच्या वेळी असतो नाईटलाईफला नसतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यानेच पब-बार बिनधास्त सुरु : देवेंद्र फडणवीस

अजित पवार क्यूँ डरते है? देवेंद्र फडणवीसांनी हत्यार उपसलं

(John Abraham and Disha Patani spotted in Mumbai shooting for Ek Villain Returns)

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.