AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING : महाविकास आघाडीत नेमकी खलबतं काय? अजित पवार यांनी आतली बातमी सांगितली

महाविकास आघाडीत नेमकी खलबतं काय सुरु आहेत, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीरपणे महत्त्वाची माहिती दिली आहे. जागा वाटपाचा सध्या फॉर्म्युला ठरलेला नसला तरी उद्धव ठाकरे यांचं नेमकं मत काय आहे, या विषयी अजित पवार यांनी उघडपणे माहिती दिली आहे.

BREAKING : महाविकास आघाडीत नेमकी खलबतं काय? अजित पवार यांनी आतली बातमी सांगितली
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 23, 2023 | 6:32 PM
Share

मुंबई : देशात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या धुराळा उडणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या जागांवर भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून वज्रमूठ घट्ट करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर महाविकास आघाडी एकत्र लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे याबाबत आपण स्टॅम्प पेपरवरही लिहून द्यायला तयार आहोत, असं अजित पवार पत्रकार परिषदेत स्पष्टपणे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीत नेमकी खलबतं काय सुरु आहेत, याबाबत मविआतील आतली बातमी सांगितली आहे.

महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपावर अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जिंकलेल्या जागा आमच्याकडेच राहाव्यात, अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. जिंकलेल्या 25 जागा सोडून महाविकास आघाडीत चर्चा होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडीत लोकसभेसाठी 16-16-16 असा फॉर्म्युला ठरलेला नाही, असंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“मी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो होतो. त्यावेळेस उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आम्ही गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकल्या राहाव्यात, अशी आमची इच्छा आहे. अशी त्यांनी त्यावेळेस व्यक्त केलेली होती. अजून त्याबाबत पुढे कोणतीही चर्चा झालेली नव्हती. तीनही पक्षांचे लोकं नेमले जाणार आहेत आणि मग चर्चा सुरु होणार आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

“चर्चा सुरु असताना साधारण चर्चेला कुठेही अडथळा येऊ नये, म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे आताचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या जागा बाजूला ठेवून 25 जागांची चर्चा करावी. 25 जागांमध्ये चर्चा करायला काही अडचण नाही. कारण त्या जागा आमच्या तीनही पक्षांकडे नाहीय”, असं अजित पवारांनी सांगितलं.

यावेळी एका पत्रकाराने आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र राहील का? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. “महाविकास आघाडी पुढच्या काळात 100 टक्के एकत्र राहणार आहे. तू स्टॅम्प आण. मी तुला त्यावर लिहून देतो. मी, उद्धव ठाकरे, नाना पटोले आम्ही सह्या करुन देतो”, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीत मतभेद असल्याच्या चर्चांबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “अशा प्रकारच्या चर्चा चालतात. एक पक्ष असला तरी त्या पक्षामधील वेगवेगळ्या नेत्यांचे विचार येतात. शेवटी त्याबाबत अंतिम निर्णय त्या पक्षाचे सर्वोच्च नेते घेतील”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

Follow Us
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन