AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांचीच खुर्ची मोठी का? रॅलीत नेमकं काय घडलं; अजित पवार यांनी दिलं कारण

सभेला सर्वच असतील असं नाही. प्रत्येक पक्षाचे दोन नेते उपस्थित राहतील असं ठरलं होतं. त्यानुसार दोनच नेते बोलले. काँग्रेस नेत्यांना राहुल गांधी यांच्यासोबत सुरतला जायचं होतं. त्यामुळे ते दौऱ्यावर निघून गेले, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांचीच खुर्ची मोठी का? रॅलीत नेमकं काय घडलं; अजित पवार यांनी दिलं कारण
ajit pawar Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 03, 2023 | 2:14 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडीची काल संभाजीनगरात मोठी सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र या सभेत चर्चा रंगली ती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीची. या सभेत उद्धव ठाकरे यांची सर्वात उंच खुर्ची होती. महाविकास आघाडीतील नेत्यांपेक्षाही ही खुर्ची मोठी होती. अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. अशोक चव्हाण मुख्यमंत्री राहिलेले आहेत. बाळासाहेब थोरात तर सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. माजी मंत्री आहेत. तरीही या नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे यांना बसायला मोठी आणि वेगळी खुर्ची दिल्याने चांगलीच चर्चा रंगली. त्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. स्टेजवर भेदभाव करण्यात आल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना वेगळी खुर्ची देण्यात आली होती. सभेत प्रत्येक पक्षातून दोन दोन नेते बोलणार होते. त्यानुसार ते बोलले. माझी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला विनंती आहे की कृपया काहीही गैरसमज निर्माण करू नये. आमची वज्रमूठ आम्ही आणखी घट्ट करत आहोत, असं अजित पवार म्हणाले.

डिग्रीचं काय घेऊन बसलाय?

वेळ आल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देऊ असं भाजपवाले म्हणत आहेत. वेळ आल्यावर म्हणजे काय? तुम्ही मुहूर्त पाहत आहात काय? हे निव्वळ राजकारण सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदींना 2014मध्ये डिग्री पाहून निवडून दिले आहे काय? डिग्री काय आहे? मोदींचा करिष्मापासून त्यांना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या लोकांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे आता डिग्रीचा विषय कशाला काढायचा? त्यांच्या डिग्रीचा प्रश्न महत्त्वाचा नाहीये. तर बेरोजगारी आणि महागाईचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तरुणांना रोजगार नाहीये. इतिहासाच्या अभ्यासक्रमातून काही विषय वगळण्यात आले आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरचा आहेर दिला.

बोंडेंना म्हणावं तुमचं सरकार आहे

यावेळी त्यांनी राज्यसरकारच्या कारभारावरही टीका केली. जनतेच्या पैशातून यांची जाहिरात चालू आहे. आम्ही कधीही जाहिरात केली नाही. आपलं काम चांगलं असेल तर जाहिरात करण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला. दंगलीत राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला होता. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. राजकारण किती खालच्या स्तराला गेलं आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. त्यामुळे तपास करा. हे कुणी तरी बोंडे यांना सांगा. दंगलीप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. त्यात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये, असं ते म्हणाले.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...