AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरेच्या नावानं बोंब मारता मग आरेतला बलात्कार दिसला नाही का? : आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे (Ashish Shelar criticize Thackeray Government over Violence against Women).

आरेच्या नावानं बोंब मारता मग आरेतला बलात्कार दिसला नाही का? : आशिष शेलार
| Updated on: Oct 12, 2020 | 6:51 PM
Share

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे (Ashish Shelar criticize Thackeray Government over Violence against Women). या सरकारला कसलीही लाज वाटत नाही. एवढं सगळं होतंय, पण यांना फक्त राजकारण करता येतंय, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनी मुंबईतील वीजेच्या प्रश्नावरुन सरकारवर निशाणा साधला. भाजपच्या महिला मोर्चाचा धसका घेतल्यानेच मुंबईची लाईट घालवल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला.

आशिष शेलार म्हणाले, “ठाकरे सरकार हे फक्त झोपलेलं सरकार आहे. त्यांना आता जागं करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. याची दखल घेतली नाही, तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हाच आक्रोश रस्त्यावर उतरेल. दोन महिन्याच्या आत महिला अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केलाच पाहिजे अशा केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स आहेत. मात्र, महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाही.”

“या सरकारला विद्यार्थी, शेतकरी, महिलांबद्दल काहीच पडलेलं नाही. मुख्यमंत्र्यांना बाकीचं काहीच देणं घेणं नाही. आरेच्या नावानं बोंब मारता मग आरेतला बलात्कार दिसला नाही का? रिहा चक्रवर्तीची चिंता आहे, तिची काळजी कराच, पण बाकीच्यांच काय?” असेही सवाल आशिष शेलार यांनी विचारले.

प्रसाद लाड म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत. महिलांवरील अत्याचार शिगेला पोहोचलेले आहेत. असं असताना निष्क्रीय बसून राहणाऱ्या सरकारच्या निषेधात शिवाजी पार्कवर जनतेचा प्रचंड आक्रोश दिसून आला. सरकार विरोधात भाजपने काढलेल्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.” यावेळी लाड यांनी सरकारने भाजप महिला मोर्चाचा धसका घेतला म्हणूनच मुंबईची लाईट घालवल्याचाही आरोप केला.

चित्रा वाघ यांनी देखील हे सरकार लाज आणणारं बेशरम सरकार असल्याची घणाघाती टीका केली.

संबंधित बातम्या :

‘राज्यात दिशा कायदा तात्काळ लागू करा’, भाजपचं राज्यभरात महिला अत्याचारविरोधात आक्रोश मोर्चे

संबंधित व्हिडीओ :

Ashish Shelar criticize Thackeray Government over Violence against Women

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.