AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरेच्या नावानं बोंब मारता मग आरेतला बलात्कार दिसला नाही का? : आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे (Ashish Shelar criticize Thackeray Government over Violence against Women).

आरेच्या नावानं बोंब मारता मग आरेतला बलात्कार दिसला नाही का? : आशिष शेलार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 12, 2020 | 6:51 PM
Share

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे (Ashish Shelar criticize Thackeray Government over Violence against Women). या सरकारला कसलीही लाज वाटत नाही. एवढं सगळं होतंय, पण यांना फक्त राजकारण करता येतंय, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनी मुंबईतील वीजेच्या प्रश्नावरुन सरकारवर निशाणा साधला. भाजपच्या महिला मोर्चाचा धसका घेतल्यानेच मुंबईची लाईट घालवल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला.

आशिष शेलार म्हणाले, “ठाकरे सरकार हे फक्त झोपलेलं सरकार आहे. त्यांना आता जागं करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. याची दखल घेतली नाही, तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हाच आक्रोश रस्त्यावर उतरेल. दोन महिन्याच्या आत महिला अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केलाच पाहिजे अशा केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स आहेत. मात्र, महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाही.”

“या सरकारला विद्यार्थी, शेतकरी, महिलांबद्दल काहीच पडलेलं नाही. मुख्यमंत्र्यांना बाकीचं काहीच देणं घेणं नाही. आरेच्या नावानं बोंब मारता मग आरेतला बलात्कार दिसला नाही का? रिहा चक्रवर्तीची चिंता आहे, तिची काळजी कराच, पण बाकीच्यांच काय?” असेही सवाल आशिष शेलार यांनी विचारले.

प्रसाद लाड म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत. महिलांवरील अत्याचार शिगेला पोहोचलेले आहेत. असं असताना निष्क्रीय बसून राहणाऱ्या सरकारच्या निषेधात शिवाजी पार्कवर जनतेचा प्रचंड आक्रोश दिसून आला. सरकार विरोधात भाजपने काढलेल्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.” यावेळी लाड यांनी सरकारने भाजप महिला मोर्चाचा धसका घेतला म्हणूनच मुंबईची लाईट घालवल्याचाही आरोप केला.

चित्रा वाघ यांनी देखील हे सरकार लाज आणणारं बेशरम सरकार असल्याची घणाघाती टीका केली.

संबंधित बातम्या :

‘राज्यात दिशा कायदा तात्काळ लागू करा’, भाजपचं राज्यभरात महिला अत्याचारविरोधात आक्रोश मोर्चे

संबंधित व्हिडीओ :

Ashish Shelar criticize Thackeray Government over Violence against Women

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक