AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे कुणाचा हात? ‘राज’कारण तापलं

मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेंवर हल्ला झाला. त्यानंतर मनसे विरुद्ध ठाकरे गटाचे नेते आमनेसामने आलेत. कारण हल्ल्यामागे वरुण सरदेसाई आणि संजय राऊत असल्याचा आरोप सुरु झालाय.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे कुणाचा हात? 'राज'कारण तापलं
| Updated on: Mar 04, 2023 | 2:10 AM
Share

मुंबई | मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेंवर हल्ला झाला. त्यानंतर मनसे विरुद्ध ठाकरे गटाचे नेते आमनेसामने आलेत. कारण हल्ल्यामागे वरुण सरदेसाई आणि संजय राऊत असल्याचा आरोप सुरु झालाय. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेवर, जीवघेणा हल्ला झालाय. दादरच्या शिवाजी पार्कात मार्निंग वॉकसाठी आलेल्या देशपांडेंवर अज्ञातांनी रॉड आणि स्टम्पनं हल्ला केला. ज्यात संदीप देशपांडेंच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. हल्ला करताच, हल्लेखोरांनी पळ काढला. मात्र कोणी हल्ला केला हे माहिती असून हल्लेखोरांना भीक घालणार नाही, असं देशपांडे म्हणालेत.

हल्ल्यानंतर जखमी देशपांडेंना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरेही आले. तर गंभीर इजा नसल्यानं उपचार करुन संदीप देशपांडेंना डिस्चार्ज देण्यात आला. अज्ञातांविरोधात हत्येचा प्रयत्न आणि धमकी देणे अशा कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय.

संदीप देशपांडेंनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, हल्लेखोरांनी वरुण सरदेसाई, संजय राऊतांना लिहिलेलं पत्र, आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात घेत असलेल्या भूमिकेचा उल्लेख केल्याचं सांगितलंय.

तर विधानसभेत भाजपचे आमदार नितेश राणेंनीही देशपांडेंवरील हल्ला प्रकरणात विधानसभेत वरुण सरदेसाईंचं नाव घेतलंय. आता ज्या पत्राचा उल्लेख देशपांडेंच्या जबाबात झालाय. ते पत्र देशपांडेंनी काही दिवसांआधीच राऊतांना लिहिलं होतं.

गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस अटेंशन सिकिंग होतो. तुम्ही कितीही नाकारलं तरी ही सगळी लक्षणं तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी. सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल मनाला लावून घेतली आहे. ती मनातून काढून टाका. तुम्ही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत.

राऊतांनी देशपांडेवरील हल्ल्याचा निषेध केलाय. पण हल्ल्यावरुन स्वत: देशपांडेचा रोख संजय राऊत आणि वरुण सरदेसाईंवर आहे. त्यातच अमेय खोपकरांनी या दोघांनाही चिंधी चोर गुंड म्हटलंय.

गेल्या काही महिन्यांआधी संदीप देशपांडे ठाकरे गटाच्या नेत्यांवर आक्रमक झालेत. कोरोनाच्या काळापासून, त्यांनी महापालिकेत घोटाळा झाल्याचाही आरोप केलाय. ज्या शिवाजी पार्कात देशपांडेंवर हल्ला झाला.त्या परिसरातला CCTV कॅमेरा खराब असल्याचंही कळतंय. त्यामुळं हल्लेखोरांना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. तर मनसेचे नेते मात्र घुसून मारण्याची भाषा करतायत. हल्ल्यावरुन मनसेच्या नेत्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत .आता पोलिसांचा तपास सुरु आहे. त्यामुळं तपासातून सत्य समोर येईलच.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.