AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाजप नागपूरच्या पराभवाचा आत्मचिंतन करणार”; भाजपच्या बड्या नेत्यानं पराभवाचं कारण सांगितलं

विकास कामे कधी पूर्ण होऊन दिली नाहीत आता अर्थसंकल्प पूर्ण होऊन देणार नाही असे म्हणणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद आणि जनता विरोधी आहे असल्याची टीका अनिल परब यांच्यावर करण्यात आली आहे.

भाजप नागपूरच्या पराभवाचा आत्मचिंतन करणार; भाजपच्या बड्या नेत्यानं पराभवाचं कारण सांगितलं
| Updated on: Feb 02, 2023 | 9:55 PM
Share

नागपूरः यंदा शिक्षक मतदासंघ निवडणुकीमध्ये भाजपने कोकणातली जागा मिळवली असली तरी नागपूरमध्ये मात्र पराभव पत्करावा लागला आहे. याबाबत अतुल भातळकर यांनी मुळात कोकणातली जागा ही पूर्वी शेकापची होती ती आम्ही खेचून घेतली असल्याचे सांगितले आहे. तरनागपूरमध्ये पराभव झाला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि याचं आत्मचिंतन आम्ही करू असंही त्यांनी सांगितले आहे. मात्र नागपूरमधील उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा नसून भाजप समर्थित होता हेही त्यांनी सांगितले.

शिक्षक परिषद ती निवडणूक लढवते तरीसुद्धा भाजप या निकालाचा आत्मचिंतन शंभर टक्के करणार असल्याचे अतुल भातखळकर यांनी सांगितले.

शिवसेना आमदार अनिल परब यांनी बीएमसीचा पूर्ण अर्थसंकल्प मांडल्यास आम्ही आंदोलन करू आणि गरज पडल्यास कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल परब यांना टोला लगावला आहे. भातळकर यांनी मुंबई महानगरपालिकेत आयुक्तांचं राज्य असल्याचे सांगत आयुक्तच करतील ते अंतिम असणार आहे हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे त्यावर आंदोलन करण्याची भाषा कोणीही करू नये असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

मुंबईकरांना विकास महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे पूर्ण अर्थसंकल्प मांडू देणार नाही म्हणजे काय ? असा सवाल करत तुम्ही सत्तेमध्ये असताना कधी विकास कामे केली नाहीत.

विकास कामे कधी पूर्ण होऊन दिली नाहीत आता अर्थसंकल्प पूर्ण होऊन देणार नाही असे म्हणणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद आणि जनता विरोधी आहे असल्याची टीका अनिल परब यांच्यावर करण्यात आली आहे.

यंदा केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुंबई महाराष्ट्राला काय दिलं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांना बजेट समजत नाही हा पहिला मुद्दा आहे असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांना त्यांनी लगावला आहे.

तर त्यापुढे बोलताना अतुल भातखळकर यांनी मुंबई आणि महाराष्ट्राला मोदीजींच्या नव वर्षांच्या कालखंडात जितकं मिळालं तितकं मुंबई आणि महाराष्ट्राचे इतिहासात मिळालं नव्हतं असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हे आदित्य ठाकरे यांना पुरेसे माहिती आहे. ज्या कोस्टल रोडचा जे कौतुक करतात त्या कोस्टल रोडच्या परवानग्या या केंद्र सरकारने दिल्या आहेत.

त्याच्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला मुंबईला फार मोठी मदत मोदी सरकारने केली असल्याचे सांगितले आमदार अतुल भातळखकर आपला अर्थसंकल्प या विषयावर बोलण्याकरिता ते डोंबिवलीत आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.