AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bandra Building Collapse | वांद्र्यात सहा मजली रिकाम्या इमारतीचा काही भाग कोसळला, 5 जण जखमी

वांद्र्यात एका रिकाम्या इमारतीचा काही भाग शेजारील दोन दुकानांवर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे (Bandra Building Collapse).

Bandra Building Collapse | वांद्र्यात सहा मजली रिकाम्या इमारतीचा काही भाग कोसळला, 5 जण जखमी
| Updated on: Aug 17, 2020 | 11:40 PM
Share

मुंबई : वांद्र्यात एका सहा मजली रिकाम्या इमारतीचा काही भाग शेजारील दोन दुकानांवर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे (Bandra Building Collapse). वांद्र्याच्या रिजवी महाविद्यालयाजवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

बचाव पथकाने आतापर्यंत पाच जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. बचाव पथकाचं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. दरम्यान, आतापर्यंत ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे (Bandra Building Collapse).

वांद्र्यातील शेर्ले राजन रोडवर कल्पना इमारतीजवळ ही दुर्घटना घडली आहे. ही इमारत गेल्या तीन दशकांपासून रिकामी होती. या दुर्घटनेनंतर भाजप नेते आशिष शेलार हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.