2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात फक्त इलेक्ट्रिक बसेस, डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन सुरु करणार : आदित्य ठाकरे

2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बसेस येतील, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यानी दिलीय. आगामी काळात 1900 एलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जातील असेदेखील त्यांनी सांगितले.

2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात फक्त इलेक्ट्रिक बसेस, डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन सुरु करणार : आदित्य ठाकरे
ELECTRIC BUSES
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 3:41 PM

मुंबई : सध्याच्या वातावरण बदलामुळे मुंईमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये भविष्यात फक्त इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच 2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बसेस येतील. आगामी काळात 1900 एलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जातील, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यानी दिली.

आता फक्त इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणार 

वातावरणीय बदलाचा मुंबईवर मोठा परिणाम होत आहे. अचानकपणे वातावरण बदलल्यामुळे अतिवृष्टीसारख्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे सरकारतर्फे महत्त्वाचं पाऊल जात आहे. यापुढे एखादी बस घ्यायची असेल तर किंवा बस भाडेतत्वावर घ्यायची असेल तर ती फक्त फक्त इलेक्ट्रिक बस असेल. आम्ही बेस्टच्या डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन सुरु करणार आहेत. अपारंपारिक विजेचा वापर करण्यावर आपल्याला यानंतर भर द्यावा लागेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईमध्ये आगामी काळात फक्त इलेक्ट्रिक बस

तसेच पुढे बोलताना त्यांनी मुंबईमध्ये आगामी काळात सगळ्या बसेस इलेक्ट्रिक असतील अशी माहिती दिली. “आतापर्यंत बेस्टच्या ताफ्यात 386 इलेक्ट्रिक बस आहेत. डबल डेकर बस ही मुंबईची ओळख आहे. आज 60 इलेक्ट्रिक बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडलाय. आम्ही 200 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस लवकरच घेणार आहोत, वातावरणीय बदलांना तोंड देण्यासाठी या बसेस वापरणं खूप महत्त्वाचं आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

1900 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणार

तसेच 2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 100% इलेक्ट्रिक बसेस येतील. आगामी काळात आम्ही 1900 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणार आहोत. महाराष्ट्राच्या अनेक शहरातदेखील आम्ही इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेदेखील आदित्य यांनी सांगितले.

मुंबईकरांना चांगले रस्ते, सुखकर प्रवास या सगळ्या गोष्टी पुरवणार

माध्यमांशी बोलत असताना आदित्य त्यांना भाजप नेते नितेश राणे यांनी लिहलेल्या पत्राविषयी विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना या प्रश्नावर मी काही बोलू इच्छित नाही. विरोधकांना फक्त टीका करण्याचं काम राहिलेलं आहे.  आम्ही आमचं काम करून दाखवणार आहोत. आम्ही मुंबईकरांना चांगले रस्ते, सुखकर प्रवास या सगळ्या गोष्टी पुरवणार आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच लखीमपूरमध्ये घडलेली दुर्घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. जवळपास आठवडाभरानंतर केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक केली जाते. इतके दिवस युपी पोलीस काय करत होते असा सवाल करत, उद्याच्या महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा आहे, असे आदित्य यांनी सांगितले.

इतर बातम्या :

नरेंद्र मोदी हुकूशाहीवर विश्वास ठेवतात? शहांनी सांगितलं, का असे सवाल केले जातात?

‘मराठी माणूस नॉट अलाऊड’ म्हणणाऱ्यांवर मीरा रोडमध्ये अखेर गुन्हे दाखल, मराठी एकीकरण समितीच्या संघर्षाला यश

आधी चीन, नंतर लेबनॉन, आणि आता देश-महाराष्ट्र अंधारात बुडणार? विजेचं संकट कसं काय? वाचा सविस्तर

(best have 100 percent electric buses by 2025 purchase only electric bus information given by aditya thackeray)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.