AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचा संविधान बदलण्याचा प्रयत्न, काय काय हालचाली सुरू?; नाना पटोले यांचा गंभीर आरोप

हे सरकार येडं ‌सरकार आहे. आधी ईडी होतं. आता येडं आहे. शरद पवार जसं म्हणाले की, हे‌ ईडी सरकार आहे. काय करायचं ते तेच ठरवतात. त्यानंतर चौकशीमुळं राजकीय भूमिका बदलली जाते. जो येतो, त्याला आपलंसं करून घेतलं जातं.

भाजपचा संविधान बदलण्याचा प्रयत्न, काय काय हालचाली सुरू?; नाना पटोले यांचा गंभीर आरोप
nana patoleImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 17, 2023 | 3:19 PM
Share

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपचा संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्थतज्ज्ञ विवेक देव राय यांनी संविधान बदलण्याबाबतचा लेख लिहिला आहे. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईल यांनीही भारताच्या राज्यघटनेचा ढाचा बदलण्याची भूमिका मांडली आहे. यावरून भाजपला संविधान बदलायचंय हे स्पषट होतं. त्याचा आम्ही निषेध करतो. देव राय यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा, असं आव्हानच नाना पटोले यांनी केलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित संघटना सातत्याने संविधान बदलाची मागणी करत असतात. भाजपाच्या जे मनात आहे तेच आज पुन्हा एकदा बाहेर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रजांच्या विचारांचे असे म्हणून त्यांचा अपमान करण्याचे कामही करण्यात आले. या सर्वांवर खुलासा होणे गरजेचे आहे. तसेच विवेक देबराय आणि रंजन गोगई यांचे राजीनामे पंतप्रधानांनी घेतले पाहिजेत, अशी मागणीच नाना पटोले यांनी केली.

नाना पटोले यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. त्यामुळे आमच्या महाराष्ट्रातील जागा नक्कीच वाढतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडी लोकसभेच्या 40 ते 45 जागा जिंकेल असा अंदाज आहे. लोकांचा कौलही तसाच दिसून येतोय, असा दावा नाना पटोले यांनी केला.

लोक इंडियालाच पसंती देतील

कुठला सर्व्हे काय सांगतो माहीत नाही. पण इंडियाला लोक पसंतील देतील असं चित्रं आहे कारण बेरोजगारी आणि महागाई वाढलेली दिसत आहे. लोक त्याला कंटाळले आहेत. महागाईने सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे लोक मतपेटीतून या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोदींच्या बोलण्यात घमंडीपणा

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. मी पुन्हा येईल म्हटल्यावर देवेंद्र फडणवीस यांची‌ काय अवस्था झाली हे पाहायला मिळालं. मोदींच्या बोलण्यातून घमंडीपणा मोदी दिसून येतोय. त्यामुळेच ते मी पुन्हा येईल असं म्हणत आहेत. ते परत आल्यावर पाहून घेऊ, असंही ते म्हणाले.

फेकाफेकी सुरूच

घोषणा घोषणा घोषणा म्हणजे काय तर पंतप्रधानांचं फेकणं सुरू आहे. लोकशाही लोकांच्या जीवावर चालते. त्यामुळं नेत्यांना लोकं उत्तर देतीलच, असंही ते म्हणाले.

नाराजी अजून वाढेल

मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करून आमदारांनी मंत्रीपद घेतल्याचं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भरत‌ गोगावले यांच्यासारखेच‌ अनेक आमदार नाराज आहेत‌. कारण अनेकांना मंत्रिपदाची‌ संधी दिली नाही. त्यामुळं नाराजी अजून वाढेल, असा दावा त्यांनी केला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल