AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात कोण किती जागा लढणार, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले जागा वाटप

loksabha election 2024 | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर 2024 ची लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता महाराष्ट्रात महायुतीचा जागा वाटपचा फार्मूला ठरला आहे. हा फार्मूला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केला आहे.

राज्यात कोण किती जागा लढणार, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले जागा वाटप
devendra fadnavis
| Updated on: Nov 26, 2023 | 11:29 AM
Share

गजानन उमाटे, मुंबई, दि. 26 नोव्हेंबर 2023 | सध्या पाच राज्याची विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीस लोकसभेची सेमीफायनल म्हटले जात आहे. या सेमीफायनलचे निकाल ३ डिसेंबर रोजी येणार आहे. दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात महायुतीकडून तयारी सुरु आहे. महायुतीत जागा वाटपाचा फार्मूला ठरला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तीन पक्षांत कोण किती जागा लढवणार आहे, हे निश्चित झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यानुसार राज्यात भाजप २६ लोकसभेच्या जागा लढवणार आहे. तसेच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना २२ जागेवर आपले उमेदवार देणार आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जागा वाटपाचा फार्मूला ठरला आहे. त्यानुसार भाजप २६ जागांवर लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी २२ जागांवर लढतील. जागावाटपाचा हा फॉर्मूला निश्चित झाला असून त्यावर लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे,” देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला फार्मूला शिवसेना आणि राष्ट्रवादी मान्य करणार का? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान राज्यात आरक्षणावरुन तणाव निर्माण झाला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. ओबीसी आरक्षणास धक्का लागणार नाही, हे त्यांनी या मुलाखातीत पुन्हा स्पष्ट केले.

सर्व्हेनंतर घेतला निर्णय

महायुतीचा सर्व्हे नुकताच झाला आहे. भाजपचा वेगळा सर्व्हे राज्यात झाल्या आहे. गेल्यावेळी भाजप २५ जागा लढवल्या होत्या. त्यातील २३ जागा भाजपने जिंकल्या होत्या. सर्व्हेनुसार ज्या ठिकाणी जो पक्ष जिंकून येईल, त्या ठिकाणी त्या पक्षाला संधी दिली जाणार आहे. विदर्भात भाजप मजबूत आहे. त्या ठिकाणी भाजप जागा लढवणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी तर कोकण आणि मुंबईत शिवसेनेला जास्त जागा देण्यात येणार आहे.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....