AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026 Voting : आम्ही बांगड्या भरल्या आहेत का? काय झालं? बाळा नांदगावकर इतके का संतापले?

BMC Election 2026 Voting : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झालीय. पहिल्या दोन तासात मुंबईत सकाळी 9.30 वाजेपर्यंत 6.98 टक्के मतदान झालं आहे.

BMC Election 2026 Voting : आम्ही बांगड्या भरल्या आहेत का? काय झालं? बाळा नांदगावकर इतके का संतापले?
bala nanadgaonkar
| Updated on: Jan 15, 2026 | 12:32 PM
Share

“केवळ मराठी नाही तर, इतर भाषिक लोक देखील मतदानासाठी बाहेर पडले आहेत. मुंबई सेफ ठेवायची असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही. या हेतूने मतदान सुरू आहे. याचा मला आनंद आहे” असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. “बोटाची शाई पुसल्याचे प्रकार समोर येत आहेत, त्यावर बाळा नांदगावकर म्हणाले की, लोकांचा मतदान प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालल्याचं मला दुर्देवाने बोलायला लागतय. सरकार आपल्या फायद्याचं कसं होईल यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लावत आहे” असा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला.

“आता ते पाडू मशीन आणलं. मला कळत नाही व्हीव्हीपॅट मशीन काढलं आणि हे पाडू मशीन आणलं. आम्ही म्हणतो व्हीव्हीपॅट लावा. आता काल हे मशीन आणण्याचं काय गरज होती?. लांडी लबाडीने आपल्याला मतदान कसं होईल यासाठी या क्लृप्त्या लावल्या जात आहेत. त्यामुळे याच्यावरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. मला पूर्ण खात्री आहे ठाकरे बंधू हे महानगरपालिका आपल्या ताब्यात घेतील” असा बाळा नांदगावकर म्हणाले.

आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का?

दुबार मतदारांना पकडण्यासाठी भगवा गार्ड बनवण्यात आलय. त्यावर बाळा नांदगावकर म्हणाले की, “प्रशासनाने कितीही विरोध केला तरी त्यांनी त्यांचं काम करावं. आम्ही आमचं काम करत आहोत” “तुम्ही चुकीच्या गोष्टी करणार, अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन, यंत्रणेला हाताशी घेऊन तर आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का?” असा आक्रमक प्रश्न बाळा नांदगावकर यांनी विचारला. “आम्ही बघणार काय करायचं ते, आमची फौज तयार आहे आणि दुबार मतदार जर आले तर त्यांना सटकवून काढायला आम्ही कमी करणार नाही” अशी आक्रमक भाषा नांदगावकर यांनी केली.

सत्तेचा किती गैरवापर करायचा याला मर्यादा असली पाहिजे

“आम्ही आमच्यापरीने जे काही शक्य आहे ते करतोय. ही काही चांगली लोकशाहीची लक्षण नाहीत. या असल्या निवडणुका देशात होणं, अशा फ्रॉड निवडणुकीमधून सत्तेवर येणं याला निवडणूक म्हणत नाहीत. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला मर्यादा असली पाहिजे” अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक