AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arnab Goswami | अर्णव गोस्वामींचा जेलमधील मुक्काम वाढला, हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाहीच

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना मोठा झटका मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन याचिकेवर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे.

Arnab Goswami | अर्णव गोस्वामींचा जेलमधील मुक्काम वाढला, हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा नाहीच
| Updated on: Nov 07, 2020 | 6:45 PM
Share

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना मोठा झटका मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन याचिकेवर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. जवळपास 6 तासांची दीर्घ सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. असं असलं तरी याचिकाकर्ते सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकतात, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं (Bombay High Court Reserves Order On Interim Bail Plea of Arnab Goswami).

अर्णव गोस्वामी यांना आज जामीन मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. हायकोर्टात आज सकाळपासून युक्तीवाद सुरु होता. मात्र, हायकोर्टाने त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसेच जामिनासाठी अलिबाग सेशन कोर्टातही याचिका करता येईल. अशी याचिका केल्यास त्यावर 4 दिवसांमध्ये निर्णय घ्यावा, असेही निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशानंतर अर्णव यांना आजची रात्रदेखील क्वारंटाईन जेलमध्ये काढावी लागणार आहे. याबाबत आता पुढील सुनावणी सोमवारी (9 नोव्हेंबर) होणार आहे.

आरोपीचे वकील हरीश साळवे यांनी 4 नोव्हेंबरपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्नब गोस्वामी यांना अंतरिम दिलासा देण्याची आग्रही मागणी केली. मात्र, न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एस. एस. कर्निक यांनी अंतरिम दिलासा देण्याबाबत तात्काळ आदेश देण्यास नकार दिलाय.

अर्णव यांच्या वकीलांनी ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणीही केली होती. तसेच कोठडीवर सुनावणी सुरु होण्याअगोदर तिन्ही आरोपींच्या वकीलांनी पोलिसांकडे दाखल केलेली पोलीस कोठडीसाठी रिवीजन कॉपी इंग्रजीमध्ये अनुवाद करुन कोर्टाकडे मागितली. त्यावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवादही केला. आरोपींचे तिन्ही वकील हे मराठी आहेत. या अगोदर कोर्टाचे सर्व कामकाजाचे पेपर मराठीमध्ये झाले आहे. त्यावर आरोपीच्या वकीलांनी मुख्य न्यायदडांधिकारी कोर्टात युक्तीवाद केला आहे.

दरम्यान, इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना 4 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर अलिबाग न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना जेलमध्ये न नेता 14 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. या नियमानुसार, अर्णव गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींना अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत ठेवलं गेलं आहे. अलिबागमधील ही शाळा आरोपींसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून करण्यात आली आहे. या शाळेतच त्यांना ठेवलं गेलं आहे.

अलिबाग पोलिसांच्या याचिकेवर 9 तारखेला सुनावणी

अर्णव गोस्वामी यांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी अलिबाग पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायलयात याचिका केली आहे. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता अर्णव यांच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनादेखील अटक करण्यात आली. या तिघांनाही अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायलयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.

संबंधित बातम्या :

Arnab Goswami | अर्णव गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीच्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलली

Arnab Goswami : मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष जगातले आठवे आश्चर्य; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

अर्णव गोस्वामींसोबत अटकेत असलेले फिरोज शेख तीन दिवसांपासून एकाच कपड्यांवर?, मानवी हक्काचे उल्लंघन; वकिलाचा आरोप

संबंधित व्हिडीओ :

Bombay High Court Reserves Order On Interim Bail Plea of Arnab Goswami

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.