AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुकसानग्रस्तांना 10 हजाराची आर्थिक मदत, टपरीधारकांनाही पहिल्यांदाच भरपाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या दुकानदाराला मदत दिली जात नव्हती. त्यांनाही आता आर्थिक भरपाई करण्यात येणार आहे. टपरीधारकांसाठी सुद्धा मदत जाहीर करण्यात आली आहे.

नुकसानग्रस्तांना 10 हजाराची आर्थिक मदत, टपरीधारकांनाही पहिल्यांदाच भरपाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2023 | 1:08 PM
Share

मुंबई | 28 जुलै 2023 : राज्यात पाऊस पडतोय. पावसाची आधी प्रतिक्षा सर्वांनाच होती. आता पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी पाऊस जास्त झाल्याने नागरिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत केली जात आहे. प्रशासन अलर्ट मोडमध्ये आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही देतानाच पूरामुळे नुकसान झालेल्यांना तात्काळ 10 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच पान टपरी आणि ठेलेधारकांनाही पहिल्यांदाच आर्थिक मदत करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते विधानसभेत बोलत होते.

पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्यांना करावयाची मदत आम्ही वाढवली आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे आपण शेतकऱ्यांना मदत केली आहे. दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले आहे. 10 हजार कोटींचे आतापर्यंत वाटप केले आहे. सतत पावसामुळे होणारं नुकसान त्यासाठी भरपाईची मागणी होती. त्यासाठी 1500 कोटी रुपयांचं वाटप सुरू आहे. पीक सन्मान योजनेत 6 हजार रुपयांची आणखी भर टाकली. म्हणजे शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

ज्यांचं नुकसान झालं. ज्यांच घर पाण्यात बुडाले, घरे पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा पूर्णपणे पडले असल्यास कपडयांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 2500 रुपये आणि घरगुती भांडी/वस्तु यांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब 2500 रुपये असे 5 हजार रुपये देण्यात येतात. पण आता आपण ही मदत 10 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

दुकानदारांना 50 हजार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक आपत्ती नुकसान झालेल्या दुकानदारांना 50 हजार रुपये मदत देणार असल्याचं स्पष्ट केलं. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या दुकानदाराला मदत दिली जात नव्हती. त्यांनाही आता आर्थिक भरपाई करण्यात येणार आहे. दुकान पाण्यात बुडालेले असल्यास, दुकान पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा दुकानांचे संपूर्ण नुकसान झाले असल्यास अशा दुकानदारांना नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येईल. जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे आणि जे रेशनकार्ड धारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदारांना ही मदत मिळेल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

टपरीधारकांना 10 हजार

टपरीधारकांसाठी सुद्धा मदत जाहीर करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त टपरीधारकांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नाही. आता या टपरीधारकांना सुद्धा पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.