AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray Delhi Visit : नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी 1200 कोटींचा निधी द्या, मुख्यमंत्र्यांची अमित शहांकडे मागणी

नक्षलवादवर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार आहेत. नक्षलवाद क्षेत्राच्या विकासकामाला गती देण्यासह अनेक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray Delhi Visit : नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी 1200 कोटींचा निधी द्या, मुख्यमंत्र्यांची अमित शहांकडे मागणी
अमित शाह आणि उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 2:11 PM
Share

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी केली. नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी हा निधी केंद्राने द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. या निधीतून नक्षलग्रस्त भागांचा जास्तीत जास्त विकास करता येईल, नव्या संकल्पणा राबविता येतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. नक्षलवादवर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थिती लावली. सकाळी 10 वाजता सुरु झालेली बैठक दुपारी 1.30 वाजता संपली. नक्षलवाद क्षेत्राच्या विकासकामाला गती देण्यासह अनेक मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या चर्चेत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपला सहभाग नोंदवला.

उद्धव ठाकरेंच्या मागण्या काय?

उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यासमोर एक विशेष सादरीकरण केलं. या सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी राज्याला 1200 कोटींचा निधी देण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे केली. जर दुर्गम नक्षलवादी भागांत विकास करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात निधी लागेल, याकामी राज्याला केंद्राने मदत करावी, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

केंद्रानं १२०० कोटींचा निधी राज्याला द्यावा. दुर्गम भागात नवीन पोलिस पोस्ट स्थापन करणार. मोबाईल टॅावर जास्तीत जास्त बसवण्यात येतील. नवीन शाळा स्थापन करण्यावर भर दिला जाईल, अशा प्रकारचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी अमित शहांसमोर आपल्या सादरीकरणातून मांडल्या.

अमित शहांच्या अध्यक्षतेखाली बैठक, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक पार पडली. राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर बैठकीत चर्चा झाली. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक हेसुद्धा बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान वर्षाहून दिल्लीला जाण्यासाठी भल्या सकाळीच रवाना झाले. दिल्लीत सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ते पोहोचले. 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विज्ञान भवनात पोहोचले. ठाकरेंसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही वेळेत उपस्थिती होते. पावणे दहाच्या सुमारास विज्ञान भवनात अमित शहांचं आगमन झालं आणि त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली.

(CM Uddhav thackeray Visit New Delhi Today Union Minister Amit Shah Called meeting over Naxalism live Updates)

हे ही वाचा :

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांसोबतही बैठक, नेमकं कारण काय?

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.