AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Update APMC closed | आशियातील सर्वात मोठं मार्केट बंद, वाशी APMC मार्केटमध्ये खबरदारी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून गर्दीची ठिकाणं बंद (APMC Market closed) करण्याचं आवाहन केलं जात आहे.

Corona Update APMC closed | आशियातील सर्वात मोठं मार्केट बंद, वाशी APMC मार्केटमध्ये खबरदारी
| Updated on: Mar 19, 2020 | 11:02 AM
Share

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून गर्दीची ठिकाणं बंद (APMC Market closed) करण्याचं आवाहन केलं जात आहे. मुंबईत प्रवाशांची संख्या घटली असताना, तिकडे नवी मुंबईतही खबरदारी घेतली जात आहे. (APMC Market closed). आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले नवी मुंबईतील एपीएमसी  फळे आणि भाजीपाला मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज भाजीपाला आणि फळ बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. हे मार्केट आठवड्यातील दर गुरुवार आणि रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे.

या मार्केटमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये राज्यात आणि राज्याबाहेरुन दररोज शेतमालाच्या 1200 ते 1500 गाड्यांची आवक होत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मार्केट पूर्ण बंद असल्याने इथे शुकशुकाट दिसत आहे. मार्केटमध्ये एकाही गाडीला प्रवेश दिला जात नाही.

दुसरीकडे कांदा बटाटा मार्केटची वेळही बदलून दुपारी चारवाजता हे मार्केट बंद करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे.

वाचा : 

देशात आणि राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर एपीएमसी बाजार समिती शक्य ती सर्व खबरदारी घेत आहे.

एपीएमसी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी, जीवनावश्यक वस्तूंची खरेदीची ऑर्डर फोनवरुन घ्या आणि माल घरपोच पाठवा, अशा सूचना प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिल्या आहेत.

तसेच फळ आणि भाजी मार्केट 31 मार्च पर्यत दर गुरुवार आणी रविवारी साफसफाई तसेच निर्जंतुकीकरण करण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय कांदा-बटाटा मार्केटची वेळ देखील बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे  बुधवार  दि. 18 मार्चपासून  सकळी साडेआठ ते दुपारी चार वाजेपर्यत मार्केट सुरू राहणार. दुपारी चारनंतर संपूर्ण बाजार समितीची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यात  येणार आहे.

संबधित बातम्या 

Corona positive | महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 47 वर, आणखी दोन महिलांना लागण

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...