AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारकडून दाऊद संबंधित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न, दरेकरांचा आरोप; भाजपचे मलिक हटाव, देश बचाव अभियान सुरू

भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, एका बाजूला साधूंसंताचा महाराष्ट्र सांगायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना फडिंग करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा. आता तर गुन्हेगारांची जमीन खरेदी केली म्हणून नवाब मलिक आरोपी नव्हेत, असा जावई शोध महाविकास आघाडी करतेय. या घटनेला मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सरकारकडून दाऊद संबंधित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न, दरेकरांचा आरोप; भाजपचे मलिक हटाव, देश बचाव अभियान सुरू
प्रवीण दरेकर आणि नवाब मलिक.
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 1:18 PM
Share

सोलापूरः महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) प्रकरणात अतिरेक्यांना पैसे पुरवण्याचे काम कोणी केले हे समोर आले आहे. हे टेरर फंडिंग कनेक्शन आहे. मलिकांना भाजपने नव्हे, तर न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे भाजपने नवाब मलिक हटाव, देश बचाव अभियान सुरू केले आहे. एकीकडे डॉक्टर आंदोलन करतायत. एसटी आंदोलन सुरूय. त्यांच्याकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. मात्र, दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी वेळ आहे, असा घणाघाती आरोप मंगळवारी भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला. ते सोलापूरमध्ये बोलत होते. आमच्यावर सुडाने कारवाई केल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकार करते आहे. मात्र, या अभियानातून त्यांचे आरोप आम्ही खोडून काढू, असा दावाही त्यांनी केला.

काय म्हणाले दरेकर?

प्रवीण दरेकर म्हणाले की, अनिल देशमुखांवर आरोप झाले. तेव्हाही भाजपचा संबंध जोडला. मात्र, यात भाजपचा कोणताही संबंध नाही. ठाण्याचे आमदार सरनाईक यांनी परदेशात व्यवहार केला त्यामुळे ईडीने कारवाई केली. वनमंत्री संजय राठोड यांनी मुलीला आत्महत्या करायला भाग पाडले. हसन मुश्रीफ यांच्या जावयाने टेंडर घेतल्यामुळे त्यांच्यावर आरोप झाले, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

मलिकांवर कारवाई कशी झाली?

प्रवीण दरेकर म्हणाले की, नारायण राणेंवरही कारवाई झाली. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी करमुसे यांना मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. यात भाजपने कोठेही तक्रार केलेली नाही. उलट नवाब मलिकांना देशभक्त दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र,सलिम पटेल आणि शाहवली खान यांच्यामार्फत जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार झाली. मुनिरा पटेल यांना पैसे न देता मुनीर पटेल आणि शाहवली खान यांना कुलमुख्त्यार केले. यात नवाब मलिक यांचा संबंध उघड झाला. त्यामुळे ही कारवाई झाली, असा दावाही त्यांनी केला.

मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न

प्रवीण दरेकर म्हणाले की, मलिकांना विनासमन्स अटक करता येत नसल्याचा युक्तिवाद केला गेला. मात्र, त्यावर कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, ही PMLA (19) ॲक्टनुसार कारवाई केली आहे. ते मनी लॉड्रिंग प्रकरणात अडकले आहेत. त्यांना भाजपने नव्हे, तर न्यायालयाने कस्टडी दिलीय. अतिरेक्यांना पैसे पुरवण्याचे काम कोणी केले हे समोर आले. हे टेरर फंडिंग आहे. एका बाजूला साधूंसंताचा महाराष्ट्र सांगायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना फडिंग करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा. आता तर गुन्हेगारांची जमीन खरेदी केली म्हणून नवाब मलिक आरोपी नव्हेत, असा जावई शोध महाविकास आघाडी करतेय. या घटनेला मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.