AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर सर्वात गंभीर आरोप, देशात आराजकता माजवण्यासाठी चीनच्या पैशांनी कट आखण्याचा डाव?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे चीनमधून फंडींग होत असून विरोधकांचा मोठा कट असल्याचा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.

देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर सर्वात गंभीर आरोप, देशात आराजकता माजवण्यासाठी चीनच्या पैशांनी कट आखण्याचा डाव?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 03, 2023 | 4:57 PM
Share

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना विरोधकांवर गंभीर आरोप केला. विशेष म्हणजे या आरोपांवेळी त्यांनी चीनमधून फंडींग होत असल्याचा देखील उल्लेख केला. तसेच आगामी लोकसभेत आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणायचं आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले. “महाविजय 2024 च्या तयारीला आपण लागलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे. हा संकल्प आहे. मोदींना देशासाठी पंतप्रधान बनवायचं आहे. आपली सर्वांची भाजप पेक्षा देशासाठी काम करतो अशी भावना असली पाहिजे”, असं फडणवीस म्हणाले.

“आपण देशासाठी सीमेची लढाई लढू शकत नाही. पण लोकशाही मार्गाने या देशाला सर्वोच्च शिखरावर पोहचवण्यासाठी आपण लढू शकतो. या राष्ट्राला सर्वोच्च शिखरावर मोदीजी नेत आहेत. 9 वर्षात भारत बदलला आहे. भारतात लोक गरिबी रेषेच्या वर आले आहेत. मोदींनी 9 वर्षात परिवर्तन करुन दाखवले. जगाच्या पाठीवर अर्थव्यवस्थेत वाढ झाली. भारताच्या प्रगतीचा वेग वाढला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“देशाची अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. ही अर्थन्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणेल, असं मोदींनी सांगितलं आहे. अर्थव्यवस्थेत जेव्हा वाढ होते तेव्हा गरिबी दुर जाते, खरी प्रगती होते. आपण आज पाहतोय, देशात महाराष्ट्रात इनफ्रास्ट्रक्चरचं काम झालं आहे. मोदींनी तयार केलेली भ्रष्टाचार विरूद्ध कार्यपद्धती आपण पाहतोय”, असं देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं.

‘देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर गंभीर आरोप’

“विरोधकांता संकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करणं आहे. विकासाचा कार्यक्रम नाही. आपलं दुकान बंद होईल म्हणून हे एकत्र आले आहेत. हे समोर आहे, पण यांच्यापाठी एक शक्ती आहे, ज्यांना अराजकता निर्माण करायची आहे. चीनच्या पैशांवर हे लोक अराजकता करत आहेत. यांचा संबध काय? चीन फंडीग करतं”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“आपली जबाबदारी आहे. आपली काम आपल्याला प्रमाणिकपणाने करायची आहेत. ज्याने पद घेतलं आहे, तशी काम करायची आहेत. पद फक्त प्रतिष्ठेसाठी नाही. आपली जबाबदारी समजून कामे केली पाहिजेत. आपले आज सत्तेत सहकारी आहेत. तीन पक्षाचं सरकार आहे. भाजप मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाने लहान भावाला सांभाळायचं असतं”, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं.

“मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपने आपली भूमिका मांडली आहे. आपण आरक्षणही दिलं. ते हायकोर्टात टिकवलंही, सुप्रीम कोर्टात जोपर्यंत आमचं सरकार होतं तोपर्यंत स्थगिती आली नाही. पण मविआचं सरकार आलं आणि आरक्षण गेलं. आणि आता ज्यांनी घालवले तेच आता तोंडवर करून मागत आहेत”, असं फडणवीस म्हणाले.

“सरकारने आज मोठ्या प्रमाणात विकासाची कामे हातात घेतली आहेत. आपले विरोधक रोज खोटं बोल पण रेटून बोल असं करत आहेत. एक अफवा सकाळी सोडायची आणि एक संध्याकाळी सोडायची. तुम्हाला संधी होती, तुम्ही झोपला होता का? जनता असं विचारते. दरवाजे बंद करुन ज्यांनी सरकारे चालवली ते आम्हाला काय विचारणार आहेत?”, असा सवाल फडणवीसांनी केला.

“काँग्रेस नेते राहुल गांधींना आज ओबीसी आठवायला लागले आहेत. आम्ही ओबीसी मंत्रालय बनवले. ओबीसींच्या विकासावर एक जीआर मविआने दाखवावा. काही लोक लबाड आहेत. अशा लबाडांपासून जनतेला आपल्याला सावध करायचं आहे. लबाड म्हणजे वागणूकीने, कारण आपल्या विरोधकांना असं नाही म्हणायचे”, असं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच