AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: एक निर्णय आणि बाळासाहेब, पवारांच्या पंक्तीत फडणवीस, सरकारमध्ये नसूनही सत्तेचा ‘रिमोट कंट्रोल’ फडणवीसांच्या हाती, विषय हार्डय समजून घ्या

सत्ता सोडताना केलेल्या दोन्ही भाषणामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा एखाद्या राजकीय ऋषीप्रमाणे झाली होती. फडणवीसांची प्रतिमा ही सत्तापिपासू अशी होत होती. त्याला तडा देण्यासाठी फडणवीसांनी हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे.

Devendra Fadnavis: एक निर्णय आणि बाळासाहेब, पवारांच्या पंक्तीत फडणवीस, सरकारमध्ये नसूनही सत्तेचा 'रिमोट कंट्रोल' फडणवीसांच्या हाती, विषय हार्डय समजून घ्या
सरकारमध्ये नसूनही सत्तेचा 'रिमोट कंट्रोल' फडणवीसांच्या हातीImage Credit source: tv9
| Updated on: Jun 30, 2022 | 5:49 PM
Share

मुंबई : जिथं सत्तेचा गेम तिथं कशाचाही नसतो नेम असचं काहीसं चित्र हे राज्याच्या राजकारणात दिसून आलं आहे. जिथं सर्वांना वाटत होतं की आता पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे होणार, त्याचं पारडं फिरलं आणि मुख्यमंत्रिपदाची माळ ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गळ्यात पडली. एवढच काय मी कॅबिनेटमध्येही नसेन हेही (Maharashtra Government Cabinet) फडणवीसांनीच जाहीर करून टाकलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाचं आता कौतुक होत आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर फडणवीसांचं नाव हे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांच्या पंक्तीत पोहोचलं आहे. सत्ता सोडताना केलेल्या दोन्ही भाषणामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा एखाद्या राजकीय ऋषीप्रमाणे झाली होती. फडणवीसांची प्रतिमा ही सत्तापिपासू अशी होत होती. त्याला तडा देण्यासाठी फडणवीसांनी हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे, असेही बोलले जाते.

बाळासाहेब शेवटपर्यंत किंगमेकर राहिले

बाळासाहेब ठाकरे हे राज्याच्या राजकारणात नेहमी किंगमेकरच राहिले. त्यांनी कधीही कोणतेही राजकीय पद हे भूषवलं नाही. मात्र शिवसेनेचं सरकार हे नेमही त्यांच्या शब्दांवर हलायचं. बाळासाहेबांचा आदेश हे नेहमी फायनल असायचा. मुख्यमंत्री कुणीही असले तरी राज्याच्या राजकारणात बाळासाहेबांचं राजकीय वजन मोठं राहिलं आहे. तसेच चित्र आता फडणवीसांच्या या निर्णयामुळे तयार झालं आहे.

आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल पवारांकडे राहिला

बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच भूमिका नंतरच्या काळात दिसून आली. त्याच जोरदार गेल्या अश्यक वाटणारी सत्ता ही पवारांनी खेचून आणली. तर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करत मोठा मास्टरस्ट्रोक मारला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असल्यानेच महाविकास आघाडी सरकार हे अडीच वर्षे टिकलं असेही बोलले जाते. अन्यथा तेवढा काळही हे सरकार तग धरू शकलं नसतं, असेही अनेक राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळेच पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करत सरकारची सुत्रं ही आपल्याकडे ठेवली होती.

मी पुन्हा येईन…ची प्रतिमाही पुसली जाणार

मागच्या निवडणुकीत फडणवीसांचं एक वाक्य सर्वात जास्त गाजलं ते म्हणजे, मी पुन्हा येईन…या वाक्यनं राज्याच्या राजकारणात धुमाकूळ घातला होता. यावर अनेक मीम्सही बनत होते.  मी पुन्हा येईन, याही फडणवीसांच्या वक्यामुळे त्यांच्या मोठ्या प्रमाणात टीका होत होती. तीही टीका आता या निर्णयाने पुसली जाणार आहे

शिंदे सरकारचा रिमोट कंट्रोल फडणवीसांकडेच

आता सरकार जरी एकनाथ शिंदे याचं स्थापन होत असले तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल हा फडणवीसांकडेच असणार आहे. त्यामुळे फडणवीसांचा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही सणसणीत उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांकडेही आता बोलण्यासारखं फार काही नसणार आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.