AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धारावीच्या सर्वेक्षणाने गेल्या सर्वेक्षणाचा रेकॉर्ड मोडला, ६३ हजार गाळ्यांचे सर्वेक्षण पूर्ण

धारावीत कोणीही घरापासून वंचित राहणार नाही, असे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे.

धारावीच्या सर्वेक्षणाने गेल्या सर्वेक्षणाचा रेकॉर्ड मोडला, ६३ हजार गाळ्यांचे सर्वेक्षण पूर्ण
dharavi slums
| Updated on: Mar 25, 2025 | 6:57 PM
Share

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाने नवा टप्पा गाठला आहे. सध्या सुरु असलेल्या व्यावसायिक आणि निवासी गाळ्यांच्या सर्वेक्षणाने गेल्या सर्वेक्षणाचा ( साल २००७-०८ ) रेकॉर्ड मोडला आहे. सध्याच्या सर्वेक्षणात सुमारे ६३ हजाराहून अधिक गाळ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तळ मजल्यावरील भाडेकरुंसह गाळ्यांचे सर्वेक्षण झाले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केवळ तळ मजल्यावरील भाडेकरूंच्या गाळ्यांना मोफत घरांसाठी पात्र मानले जाते.

‘आमच्या सर्वेक्षणाने एक महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. ही सरकारसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. हा पुनर्विकास प्रकल्प केवळ तळमजल्यावरील भाडेकरूंपुरता मर्यादित नसून, वरच्या मजल्यांवरील बांधकामांचाही यात समावेश होतो. त्यामुळे सरकार सर्वांसाठी घरे देण्यासाठी पुढाकार घेत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे.

नव्या सर्वेक्षणात ९५ हजारांहून अधिक गाळ्यांचे गल्लीबोळात जाऊन सर्वेक्षण झाले. यावेळी ८९ हजारांहून अधिक गाळ्यांना क्रमांक दिला आहे. तसेच ६३ हजारांहून अधिक गाळ्यांचे घरात जाऊन सर्वेक्षण केले झाले. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत सध्याच्या सर्वेक्षणात तळमजल्यावरील भाडेकरूंची घरे, वरच्या मजल्यांवरील बांधकामे, सध्याच्या अस्तित्वातील एसआरए इमारती, आरएलडीए जमिनीवरील झोपडपट्टीवासी नागरिक, तसेच सर्व धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

त्यांचे सर्वेक्षण पुन्हा केले जाण्याची शक्यता कमी

आता आम्ही सर्वेक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. यातून स्पष्टपणे कळते की धारावीकर पुनर्विकासाच्या बाजूने असून ते सर्वेक्षणात सक्रियपणे सहभागी होत आहेत.आम्ही सर्व रहिवाशांना लवकरात लवकर सर्वेक्षणात सहभाग होण्याचे आवाहन करीत आहोत. त्यामुळे पुढील टप्पे सुरू करता येतील. ज्या रहिवाशांनी सर्वेक्षणात भाग घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर स्वेच्छेने या प्रक्रियेत सहभाग घ्यावा. ज्या भाडेकरूंनी किंवा रहिवाशांनी सर्वेक्षणात सहभाग घेण्यास नकार दिला आहे, किंवा वारंवार विनंती करूनही आवश्यक कागदपत्रे दिलेली नाहीत. त्या भाडेकरूंच्या घरांचे इथून पुढे सर्वेक्षण पुन्हा केले जाण्याची शक्यता कमी आहे असेही श्रीनिवास यांनी म्हटले आहे.

पुनर्वसनासाठी आवश्यक घरांची संख्या वाढलीय

नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ( एनएमडीपीएल ), विशेष उद्देश कंपनीतर्फे सुमारे १ लाख ५० हजार घरांच्या सर्वेक्षणाची तयारी केली गेली आहे. कारण बहुतेक झोपड्या या तळमजला अधिक दुसऱ्या मजल्यापर्यंत वाढलेल्या आहेत. ज्यामुळे पुनर्वसनासाठी आवश्यक घरांची संख्या वाढली आहे.

अपात्र ठरतील, त्यांचे धारावीच्या बाहेरील पुनर्वसन

धारावीकरांकडून आम्हाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.आम्ही सर्वेक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत आणि याचा आम्हाला आनंद आहे. अद्याप सर्वेक्षणात भाग न घेतलेल्या रहिवाशांना लवकरात लवकर पुढे यावे असेही एनएमडीपीएल प्रवक्त्यांनी म्हटले आहे. पात्र धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच केले जाणार आहे. जे रहिवासी अपात्र ठरतील, त्यांना धारावीच्या बाहेरील आधुनिक वसाहतीत स्थलांतरित केले जाईल. या वसाहतीत चांगल्या सुविधा आणि आधुनिक पायाभूत सोयी उपलब्ध असतील. या नव्या वसाहती मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) तयार होतील. त्यामध्ये मेट्रोसह इतर चांगल्या सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध असतील.

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.