AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील 18 लाख कर्मचाऱ्यांच्या संपात फूट; कोणत्या संघटनेने मांडली वेगळी भूमिका…

अडीच लाख कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता संपामध्ये फूट पडल्याचे सांगण्यात येत आहे.  या संपातून कर्मचाऱ्यांनी माघार घेत आपण सरकारला समजून घेतले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. 

राज्यातील 18 लाख कर्मचाऱ्यांच्या संपात फूट; कोणत्या संघटनेने मांडली वेगळी भूमिका...
| Updated on: Mar 14, 2023 | 5:58 PM
Share

मुंबई : एकच मिशन, जुनी पेन्शन म्हणून तीव्र आंदोलन पुकारणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोनलनात आता फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.  जुनी पेन्शन योजनेसाठी राज्यातील 18 लाख कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारण्यात आले.मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे सगळी व्यवस्था कोलमडलेली होती. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही संपातून माघार घेणार नाही अशी भूमिका शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतली होती. मात्र आता संप करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये फूट पडल्याने संपाची ही धार कायम राहणार की, बोथट होणार असा सवाल आता केला जात आहे.

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील लाखो कर्मचारी सहभागी झालेले असतानाच प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य संघटनेने संपातून माघार घेतल्यामुळे उभा आंदोलनात फूट पडल्याचे बोलले जात आहे.

प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य संघटनेने आपण या संपातून माघार घेत असल्याचे सांगत आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.

राजपत्रित कर्मचारी संघटनेचे मुख्य सल्लागार गणपत कुलथे यांनी सांगितली की, शासनाकडून कर्मचाऱ्यांना फायदा होत असतो.त्याचबरोबर शासनाच्याही काही अडचणी असतील तर त्या कर्मचाऱ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. मात्र आमच्या मागण्यांसाठी आणि पुढील ध्येय धोरणे ठरवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेची संपातून माघार घेतली जात असून या संपातून अडीच लाख कर्मचारी माघार घेतली असल्याचेही संभाजी थोरात यांनी सांगितले.

अडीच लाख कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता संपामध्ये फूट पडल्याचे सांगण्यात येत आहे.  या संपातून कर्मचाऱ्यांनी माघार घेत आपण सरकारला समजून घेतले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य संघटनेने सरकारला आपण समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगत. पुढील निर्णयासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.