AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पाठीमागं खंजीर खुपसण्याचं काम हे रामदास कदम करत नाही”; ईडी प्रकरणावरून कदमांनी नेमकं कुणाला सुनावलं

सदानंद कदम आणि अनिल परब यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर ती कारवाई रितसरपणे करण्यात आली आहे.

पाठीमागं खंजीर खुपसण्याचं काम हे रामदास कदम करत नाही; ईडी प्रकरणावरून कदमांनी नेमकं कुणाला सुनावलं
| Updated on: Mar 14, 2023 | 5:48 PM
Share

गुहागर/रत्नागिरी : सध्या कोकणातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमधील गोळी मैदानावर सभा झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. त्यातच रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कमद यांना ईडीकडून ताब्यात घेऊन 15 मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर रामदास कदम आणि त्यांचे भाऊ सदानंद कदम, अनिल परब यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या सदानंद कदम यांच्यावर आता रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत.

तर अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांनी अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सदानंद कदम यांना अनिल परब यांनी फसवलं असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

अनिल परब यांच्या ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर रत्नागिरीतील राजकारण प्रचंड तापले होते. त्यातच उद्धव ठाकर यांची गोळी मैदानावर सभा झाल्यानंतर सदानंद कदम यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली.

सदानंद कदम यांच्यावर कारवाई होताच विरोधकांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. सदानंद कदम यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही रामदास कदम यांच्यामुळे झाली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर सदानंदर कदम यांच्याप्रकरणी आरोप केल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत सांगितले आहे की, सदानंद कदम यांच्यावर जी ईडीची कारवाई झाली आहे त्यामध्ये रामदास कदम यांचा हात नाही.

तसेच पाठीमागं खंजीर खुपसण्याचं काम रामदास कदम कधीच करत नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

सदानंद कदम आणि अनिल परब यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर ती कारवाई रितसरपणे करण्यात आली आहे.

त्यामुळे त्या प्रकरणात माझा काही संबंध नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ईडीच्या कारवाईवर बोलताना ते म्हणाले की, ईडी माझ ऐकणार असती तर सर्वात पहिल्यांदा अनिल परब यांना आत टाकायला सांगितलं असतं असा टोला त्यांनी अनिल परब यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर सदानंद कमद यांच्यावर कारावई करण्यात आल्यानंतर राजकीय द्वेषापोटीच सदानंद कदम यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर करण्यात आला होता.

मात्र रामदास कदम या प्रकरणाविषयी बोलताना सांगितले की, अनिल परब यांनी सदानंद कदम यांना फसवण्यात आले असल्याचा आरोपही त्यांनी अनिल परब यांच्यावर करण्यात आला आहे.

रत्नागिरीच्या राजकारणावर बोलताना सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. सदानंद कदम यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी थेट रामदास कदम यांच्यामुळेच सदानंद कमद यांच्यावर कारवाई झाल्याचा आरोप केला होता.

त्यावर रामदास कदम यांनी आपल्या शब्दात प्रत्युत्तर दिले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अनिल परब आणि सदानंद कदम हे केबल व्यावसायिक आहेत पार्टनर आहेत. त्यामुळे या प्रकरणी सगळ्यात आधी चौकशी ही अनिल परब यांची केली पाहिजे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.