AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2023 : कल्याणच्या बाजारात गुजरातच्या पणत्या, ‘या’ कारणामुळे कुंभार करत आहेत आयात

पणत्या, मडकी यासारख्या मातीच्या वस्तु काळ्या मातीपासून बनवून त्या भट्टीत भाजून तयार कराव्या लगतात. मात्र विकासाच्या गराड्यात भट्टया गायब होत होत नामशेष झाल्या आहेत. भट्टया पेटविण्यासाठी जागा राहिलेली नसून, मोकळ्या जागेवर भट्टी पेटवल्यास त्यातून निघणाऱ्या धूरांमुळे प्रदूषण होत असल्याने या भट्टया बंद कराव्या लागल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Diwali 2023 : कल्याणच्या बाजारात गुजरातच्या पणत्या, 'या' कारणामुळे कुंभार करत आहेत आयात
गुजरात मधून आणलेले दिवेImage Credit source: Tv9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 08, 2023 | 9:46 AM
Share

मुंबई : दिव्यांचा सण दिवाळी (Diwali) हा अगदी दोनच दिवसांवर येऊन ठेपला आहे. धनत्रयोदशीपासून घरोघरी पणत्यांमध्ये दिवे लावले जातात. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पणत्यांची दूकाने थाटलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवाळी या दिव्याच्या सणाला पणत्याना मोठी मागणी असली तरी पारंपरिक पणत्या, टिवल्या बनविणायसाठी लागणाऱ्या कल्याणतील भट्टया काळाच्या पडद्याआड गडप झाल्याने विक्रेत्यानाच नव्हे तर कुंभारांना देखील या पणत्या गुजरात मधून विकत घ्याव्या लागत आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या पणत्या या थेट गुजरात मधून आणल्या जात असून, या पणत्या 3 रुपये प्रती नग या दराने खरेदी कराव्या लागत आहेत. मात्र 5 रुपयांनासुद्धा या पणत्या कोणी ग्राहक घेण्यास धजावत नसल्याने विक्रेत्यांसह कुंभारवाडातील कुंभाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

विकासाच्या गराड्यात भट्या गायब

पणत्या, मडकी यासारख्या मातीच्या वस्तु काळ्या मातीपासून बनवून त्या भट्टीत भाजून तयार कराव्या लगतात. मात्र विकासाच्या गराड्यात भट्टया गायब होत होत नामशेष झाल्या आहेत. भट्टया पेटविण्यासाठी जागा राहिलेली नसून, मोकळ्या जागेवर भट्टी पेटवल्यास त्यातून निघणाऱ्या धूरांमुळे प्रदूषण होत असल्याने या भट्टया बंद कराव्या लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कल्याणात भगवा तलावाजवळ असलेली भट्टी आजही सुरू असली तरी या भट्टीत तयार होणाऱ्या पणत्या मागणीप्रमाणे पुरेशा नसल्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी गुजरात मधून पणत्यांची आयात करावी लागत असल्याचे विक्रेत्यानी संगितले.

दिवाळीत छोट्या चुली आणि दळण दळण्याच्या जात्याची देखील पूजा केली जाते. या वस्तु देखील पूर्वी काळ्या मातीपासून तयार केल्या जात असत मात्र आता भट्टी नसल्याने या वस्तू माती ऐवजी पीओपी पासून तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. पीओपी घातक आहे हे माहीत असले तरी दुसरा पर्याय नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले सांगितले.

Diya imported form Gujrat

गुजरातवरून मागवलेल्या पणत्या

गुजरातमध्ये होते मोठ्या प्रमामात उत्पादन

कलाकुसर केलेल्या पणत्या तसेच वेगवेगळ्या आकाराचे आकर्षक दिवे हे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. असे दिवे तयार कण्यासाठी व्यापाऱ्यांना गुतवणूकही मोठी करावी लागते शिवाय मनुष्यबळाचीही मोठ्या प्रमाणात गरज असते. व्यावसायाचे हब असलेल्या गुजरातमध्ये अनेकांनी मोठी गुंतवणूक करून हे आकर्षक माताचे दिवे तयार करण्याचे कारखाने उभारले आहेत. या दिव्यांना भारतातील इतर भागातून मोठी मागणी असल्याने त्याची निर्यात केली जाते.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली