AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीमुळे चार दिवस मुंबईत दारूविक्री बंद

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत चार दिवस दारूविक्रीवर बंदी असणार आहे. संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मुंबईत निवडणूक प्रचार संपताच सायंकाळी ६ वाजल्यापासून दारूबंदी करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीमुळे चार दिवस मुंबईत दारूविक्री बंद
| Updated on: Nov 18, 2024 | 7:48 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे या आठवड्यात चार दिवस मुंबईत दारूविक्री बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना चार दिवस ड्राय डे पाळावा लागणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी 6 वाजता संपलाय. आता निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, मतदान संपेपर्यंत शांतता कालावधी लागू राहील. 20 नोव्हेंबरला 288 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील निवडणूक प्रचार संपल्यानंतर आयोगाच्या आदेशानुसार मुंबईत चार दिवस ‘ड्राय डे’ असणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण मुंबई शहरात चार दिवसासाठी मद्यविक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. ड्राय डेचे उद्दिष्ट कमीत कमी अडथळे आणणे आणि मतदारांनी दारूच्या प्रलोभनाला बळी पडू नये हे सुनिश्चित करणे हा आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, मुंबई आणि इतर शहरांमध्ये 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 नंतर मद्यविक्रीवर बंदी असेल. ठाणे आणि पुण्यात देखील निवडणुकीपूर्वी ड्राय डे असल्याने दारू मिळणार नाही. आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण निवडणुकीच्या दिवशी मद्यविक्रीवर बंदी घालण्यात येईल. मतदान संपल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता कोणतीही विक्री होणार नाही. 23 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर होईपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंशिक दारूबंदी कायम राहणार आहे.

20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान

महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी आणि निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीत 9,70,25,119 पात्र मतदार मतदानाचा हक्क बजावतील, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने 20 नोव्हेंबर हा दिवस त्यांच्या अखत्यारीतील सर्व व्यवसाय आणि कार्यालयांसाठी सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केले आहे. या उपक्रमाचा उद्देश जास्तीत जास्त मतदान सुनिश्चित करणे हा आहे. ज्यामुळे रहिवाशांना कामाशी संबंधित अडचणींशिवाय त्यांचा मतदानाचा अधिकार वापरता येईल.

Follow Us
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.