AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ‘ईडी’कडून ‘एमएमआरडी’च्या आयुक्तांना समन्स

आता आर.ए. राजीव यांना 'ईडी'समोर हजर राहावे लागेल. या चौकशीत ते काय सांगतात आणि त्याचे काय परिणाम होणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. | ED MMRDA

मोठी बातमी: टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात 'ईडी'कडून 'एमएमआरडी'च्या आयुक्तांना समन्स
आर.ए. राजीव
| Updated on: Feb 15, 2021 | 11:50 AM
Share

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे गाजलेल्या टॉप्स सिक्युरिटी (Tops Security) प्रकरणात आता सक्तवसुली संचलनालयाने (ED) आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. ‘ईडी’कडून मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) सचिव आर.ए. राजीव यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता आर.ए. राजीव यांना ‘ईडी’समोर हजर राहावे लागेल. या चौकशीत ते काय सांगतात आणि त्याचे काय परिणाम होणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (ED issues summons to MMRDA chief R.A. Rajiv)

या प्रकरणात ईडीने आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांचा समावेश होता.

यापूर्वी डिसेंबर महिन्यात ‘ईडी’कडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी करण्यात आली होती. त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यालाही ईडीने चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती.

मात्र, प्रताप सरनाईक यांच्या डिसेंबर महिन्यातील चौकशीनंतर हे प्रकरण फारसे पुढे सरकले नव्हते. तेव्हा प्रताप सरनाईक यांनी ईडीने अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आपली चौकशी केल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता ईडीने थेट ‘एमएमआरडीए’च्या आयुक्तांनाच समन्स पाठवल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.

काय आहे नेमका घोटाळा?

टॉप्स ग्रुपकडून MMRDA ला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच देण्यात आली होती. टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी 28 ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.

राहुल नंदा यांच्या टॉप्स सिक्युरिटीकडून 100 पैकी फक्त 70 टक्के गार्ड्स वापरले जायचे. 30 टक्के गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. म्हणजेच जवळपास 150च्या आसपास गार्ड्स वापरले जात नव्हते. मात्र त्याची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती तपासातून उघड झाली होती.

संबंधित बातम्या:

जे सत्य आहे ते मी सांगितलंय, माझा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही : प्रताप सरनाईक

केंद्र-राज्य संघर्षात मी तानाजी मालुसरे झालो : प्रताप सरनाईक

Special Report | प्रताप सरनाईकांच्या चौकशीतून ईडीच्या हाती काय लागणार?

(ED issues summons to MMRDA chief R.A. Rajiv)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.