AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणी मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडवर

तलाठी भरती परीक्षा सुरु असताना पेपर फुटीचं धक्कादायक प्रकरण समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरकारने याप्रकरणी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणी मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडवर
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 30, 2023 | 5:48 PM
Share

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : राज्यात सध्या तलाठी भरतीच्या परीक्षा सुरु आहेत. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत या परीक्षा संपतील. पण या परीक्षा सुरु झाल्यापासून वादात सापडल्या आहेत. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेला उशिर झाला. काही ठिकाणी पेपर फुटीचा प्रकरण समोर आला. काही लोकांकडे प्रश्नपत्रिकाच आढळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आता याच प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. पेपर फुटी प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच तलाठी परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. असं असताना या पेपर फुटीच्या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

तलाठी पेपर भरती प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडवर आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी यासाठी वरिष्ठ पातळीवर सूत्रे हलत असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पेपर फुटी प्रकरणावर चौकशी करण्यासाठी दोन विशेष ओएसडी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्र्यांचं विद्यार्थ्यांना कारवाईचं आश्वासन

आमदार बच्चू कडू यांची आज मुंबईत एमपीएससीच्या समन्वयकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागाच्या होत असलेल्या परीक्षांची फी कमी करण्यात यावी, या विषयावर चर्चा झाली. राज्य सरकार या संदर्भात सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तलाठी पेपर फुटीसंदर्भात कडक कायदे करणार, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

बच्चू कडू यांची महत्त्वाची मागणी

दरम्यान, बच्चू कडू यांनी पेपरफुटी प्रकरणावर याआधीदेखील प्रतिक्रिया दिलीय. खून करणाऱ्याला जशी मृत्यू दंडाची शिक्षा केली जाते अगदी त्याच धर्तीवर किंवा तशीच कठोर शिक्षा पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना देण्यात यावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांची मुलं या भरतीसाठी प्रयत्न करतात. त्यामुळे पेपरफुटीतून या शेतकऱ्याच्या मुलांची संधी हिसकावली जात असल्याचीदेखील प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली होती.

Follow Us
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?