काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हाणमारी; नेमकं काय घडलं?
काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हाणमारी झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अहमदाबादच्या एका शाळेत काँग्रेस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. पाकिस्तान लेखिका मलाला यूसुफजी यांचं पुस्तक ‘आय एम मलाला’ वाचण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं. सिटीझन ऑफ जस्टिस अँड पीस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एका गार्डनमध्ये वाचण्यासाठी एकत्र जमले होते. याची माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचून विरोध करू लागले. त्यानंतर सिटिझन ऑफ जस्टिस अँड पीस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट आणि हाणामारी झाल्याचे दिसून आले.
काँग्रेसच्या सामूहिक पुस्तक वाचण्याचा कार्यक्रमाला बजरंग दलाचा विरोध
गार्डनमधील वादाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. बजरंग दलाचे नेते ज्वलित मेहता यांनी म्हटलं की, मलाला यांचं पुस्तक वाचू नये. मलाला या काश्मीरला पाकिस्ताचा भाग मानतात. त्यामुळे मलाला सारखी व्यक्ती ही देशविरोधीच आहे. आम्ही देशविरोधी मलालांचं पुस्तक वाचण्यास विरोध करणारच’. खरंतर या पुस्तकावरून वाद झाल्यानंतर मलालांचं पुस्तक शाळेने शिकवणे बंद केले होते. या निर्णयाच्या विरोधात काँग्रेस आणि सिटिजन ऑफ जस्टिस अँड पीसचे कार्यकर्त्यांनी मलालांचं सामूहिक वाचन करण्याचा निर्णय घेतला होता.
करवाने के लिए कांग्रेस के कुछ नेता और कथित “क्रोकोच जनता पार्टी” के लोग एकत्र हुए।
बजरंग दल को जब इस पाकिस्तान-समर्थक मानसिकता की जानकारी मिली, तो पहले समझाया… बात नहीं मानी तो फिर बजरंगी भाषा में समझाया। 2/2#BajrangDal #Gujarat pic.twitter.com/C7AlSphb6h
— Bajrang Dal Gujarat (@Bajrangdal_Guj) August 27, 2026
दोन्ही गट आमनेसामने
बजरंग दलाचे नेते ज्वलित पुढे म्हणाले, मलाला यांना जरी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला असेल. 2017 साली त्या संयुक्त राष्ट्राची ‘मेसेंजर ऑफ पीस’ ठरली. त्यानंतरही आम्ही तिचं पुस्तक वाचू देणार नाही, असे त्यांनी सांगितले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढे सांगितले की, देशातील तरुणांनी देशविरोधी शक्तींपासून दूर राहिलं पाहिजे. अशा पुस्तक वाचण्याच्या कार्यक्रमापासूनही दूर राहिलं पाहिजे. अन्यथा बजरंग दलाच्या संतापाचा सामना करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी पुस्तक वाचण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांनी बजरंग दलावर गंभीर आरोप केला. आयोजकांनी म्हटलं की, गळ्यात भगव्या रंगाचं स्कार्फ घातलेले 30-40 लोक आले. ते मारहाण करण्याच्या दृष्टीने आले होते. त्यांच्याजवळ लाठी, बॅसबॉलची बॅटसारख्या वस्तू होत्या, असा आरोप त्यांनी केला. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर दोघांमध्ये झटपट झाली.
