AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सायन-पनवेल मार्गावर महापूर, गाड्या पाण्यावर तरंगल्या, अनेक जण अडकले

खारघरमधील कोपरा पुलाजवळ पाऊस पडल्यानंतर पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. सायन-पनवेल मार्गावर अनेक ठिकाणी ही परिस्थिती झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे यामध्ये अनेक गाड्या बंद पडून पाण्यावर तरंगलेल्याही दिसत आहेत.

सायन-पनवेल मार्गावर महापूर, गाड्या पाण्यावर तरंगल्या, अनेक जण अडकले
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 09, 2019 | 4:19 PM
Share

नवी मुंबई : पावसाने थैमान घातल्यामुळे नवी मुंबईतील परिस्थिती भीषण झाली आहे. सुनियोजित बसवलेल्या शहराकडे दुर्लक्ष केल्यास त्याची काय परिस्थिती होते याचा अनुभव सध्या नवी मुंबईकर घेत आहेत. खारघरमधील कोपरा पुलाजवळ पाऊस पडल्यानंतर पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. सायन-पनवेल मार्गावर अनेक ठिकाणी ही परिस्थिती झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे यामध्ये अनेक गाड्या बंद पडून पाण्यावर तरंगलेल्याही दिसत आहेत.

खारघरमधील पांडवकडा धबधब्यातून कोसळणारं पाणी सिडको प्रशासनाने चार ते पाच किमीचा वळसा देत कोपरा गावाच्या पलीकडे असणाऱ्या खाडीत एका नाल्यातून सोडलं आहे. त्या नाल्याची व्यवस्थित साफसफाई केली नसल्याने पाण्याचा विसर्ग व्यवस्थितरित्या होऊ शकला नाही. पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर अध्यक्ष असलेल्या सिडको प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका वाहनधारकांसह स्थानिकांनाही बसतोय.

नवी मुंबईतील ऐरोली, वाशी, तुर्भे, नेरुळ, बेलापूर आणि एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं होतं. त्याचबरोबर खारघर कोपरा येथे नाला पाच दिवसांपूर्वीही तुंबला होता. स्वच्छता आणि आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही महापालिकेचे सत्ताधारी आणि ठेकेदार यांच्या कारभारामुळे सायन-पनवेल महामार्गावर ही परिस्थिती होत आहे. दुचाकी यामधअये सापडल्यास वाहून जाण्याचीच परिस्थिती आहे. तर छोटी वाहनं पाण्यावर तरंगण्याएवढा पूर येत आहे.

2005 सालच्या महापुरात पांडवकड्याच्या नाल्यातील पाण्यामुळे खारघरसह कोपरा गावाला पाण्याचा वेढा पडला होता. या घटनेतही कोपरा गावात काही प्रमाणात पाणी शिरलं होतं. त्यामुळे नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे. महामार्गावर पाणी भरल्याने जवळपास तीन ते चार किमी अंतरावर दोन्ही मार्गिका बुडाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही प्रवाशांना वाहनात अडकून पडावं लागलं. तर काही जण वाहनातून उतरून पाणी ओसरण्याची वाट पाहत होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आपत्कालीन यंत्रणा पुन्हा कोलमडून गेल्याचा प्रत्यय अनेकांनी अनुभवला.

गेल्या वर्षी खड्डे, यावर्षी महापूर

हजारो कोटी रुपये खर्चून बांधलेल्या सायन-पनवेल महामार्गाची दुरावस्था हा नवीन विषय नाही. यापूर्वी पावसाळ्यात दरवर्षी खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी प्रवाशांनी अनुभवली आहे. वाहतूक कोंडी हा अत्यंत गंभीर विषय बनल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जात होती. पण खड्डे भरण्यासाठी कोट्यवधींचं टेंडर काढलं जायचं आणि पुन्हा खड्डे पडायचे. पण यावर्षी खड्डे पडणाऱ्या ठिकाणचे रस्तेच नव्याने बांधण्यात आले आहेत. त्यामुळे खड्ड्यांचा त्रास नसला तरी रस्त्यावर महापूर येत आहे. यामध्ये गाड्या अडकून लोकांचा जीव टांगणीला लागलेला आहे.

Follow Us
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा