AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गायरान जमिनीप्रश्नी सरकारची दहशत नको, या नेत्याने थेट मुख्यमंत्र्यांचीच घेतली भेट…

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गायरान जमीन धारकांना नोटीस पाठवून जमिनी रिकाम्या करण्याच्या नोटिसा तहसीलदारांमार्फत देण्यात आल्या आहेत.

गायरान जमिनीप्रश्नी सरकारची दहशत नको, या नेत्याने थेट मुख्यमंत्र्यांचीच घेतली भेट...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 24, 2022 | 10:34 PM
Share

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून गायरान जमिनीप्रश्नी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून असलेल्या जमिनी आणि लोकांची घरं काढून घेण्याच्या नोटीसा काही भागात काढल्या गेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर काही ठिकाणी गायरान जमिनीप्रश्नावरुन मुख्यमंत्री आणि शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीकाही करण्यात आली होती. या गायरान प्रश्नावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाम भूमिका घेत त्यांनी मुख्यमंत्र्यांचीच थेट भेट घेतली आहे.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गायरान जमीन धारकांवर अन्यायकारक पध्दतीने राज्यभर कारवाई केली जात असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गायरान जमीन धारकांना नोटीस पाठवून जमिनी रिकाम्या करण्याच्या नोटिसा तहसीलदारांमार्फत देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे काही ठिकाणी घरं पाडण्यात आली आहेत. त्यामुळे अशा प्रकारे दहशत निर्माण करणे निंदनीय असून जवळपास 22 लाख लोकांना याचा फटका बसला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने हा एकतर्फी निर्णय दिला असून महाराष्ट्र सरकारने अॅडवोकॅटे जनरल यांच्यामार्फत रिप्रेझेंट करून 17 नोव्हेंबर 2002 ची अंतिम तारीख अंमलबजावणी आणि अहवाल सादर करण्यासाठी दिली होती.

त्या संदर्भात अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात यावी की, या जीआरप्रमाणे ज्यांचे नियमितीकरण होतं आहे, त्यांचे नियमितीकरण करावे.

त्याचा अहवाल उच्च न्यायालयाला पाठवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनकडे केली होती असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, आमची ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून आम्हाला आशा आहे की, राज्य शासनच न्यायालयात जाऊन ही भूमिका घेईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा