AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगतसिंह कोश्यारी जाणार..? ; त्यांच्यानंतर राज्यपाल पदासाठी ही नावं आली चर्चेत…

काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष काढला. काही दिवसांनी हा पक्ष त्यांनी भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे त्यांचेही नाव महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत आले आहे.

भगतसिंह कोश्यारी जाणार..? ; त्यांच्यानंतर राज्यपाल पदासाठी ही नावं आली चर्चेत...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jan 28, 2023 | 11:59 PM
Share

मुंबईः सातत्याने महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली गेली. त्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावर ठाम राहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्या नंतर मात्र विरोधकांनी मोर्चा काढून त्यांची राज्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली.

त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपली या पदावर राहण्याची इच्छा नसल्याचे कळवले होते.

त्यामुळे आता नव्या राज्यपालांच्या नावाची चर्चा सुरु आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेल्यानंतर महाराष्ट्राला नवे राज्यपाल कोण लाभणार याकडेच साऱ्यांचे आता लक्ष लागून राहिले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी पंतप्रधान यांच्याकडे केल्यानंतर या पदासाठी आता भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत.

पहिले नाव आहे ओमप्रकाश माथूर यांचेय भाजपचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचे प्रभारी आणि ते भाजपचे सरचिटणीस या पदावरही ते राहिले आहेत. तर दुसरं नावं चर्चेत आहे ते म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे.

राजस्थानच्या राजकारणातील एक मोठं नावं म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे भाजपमध्ये येण्याआधी ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.

त्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष काढला. काही दिवसांनी हा पक्ष त्यांनी भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे त्यांचेही नाव महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत आले आहे.

तर या दोन नावानंतर आता तिसरं एक नाव चर्चेत आले आहे. ते म्हणजे सुमित्रा महाजन यांचे. त्यांनी नकळत आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. पक्षाने आपल्या पालक म्हणून महाराष्ट्रात पाठवावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राहणार की जाणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत