AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगतसिंह कोश्यारी जाणार..? ; त्यांच्यानंतर राज्यपाल पदासाठी ही नावं आली चर्चेत…

काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष काढला. काही दिवसांनी हा पक्ष त्यांनी भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे त्यांचेही नाव महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत आले आहे.

भगतसिंह कोश्यारी जाणार..? ; त्यांच्यानंतर राज्यपाल पदासाठी ही नावं आली चर्चेत...
| Updated on: Jan 28, 2023 | 11:59 PM
Share

मुंबईः सातत्याने महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली गेली. त्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावर ठाम राहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्या नंतर मात्र विरोधकांनी मोर्चा काढून त्यांची राज्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली.

त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपली या पदावर राहण्याची इच्छा नसल्याचे कळवले होते.

त्यामुळे आता नव्या राज्यपालांच्या नावाची चर्चा सुरु आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेल्यानंतर महाराष्ट्राला नवे राज्यपाल कोण लाभणार याकडेच साऱ्यांचे आता लक्ष लागून राहिले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी पंतप्रधान यांच्याकडे केल्यानंतर या पदासाठी आता भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत.

पहिले नाव आहे ओमप्रकाश माथूर यांचेय भाजपचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचे प्रभारी आणि ते भाजपचे सरचिटणीस या पदावरही ते राहिले आहेत. तर दुसरं नावं चर्चेत आहे ते म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे.

राजस्थानच्या राजकारणातील एक मोठं नावं म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे भाजपमध्ये येण्याआधी ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.

त्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष काढला. काही दिवसांनी हा पक्ष त्यांनी भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे त्यांचेही नाव महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत आले आहे.

तर या दोन नावानंतर आता तिसरं एक नाव चर्चेत आले आहे. ते म्हणजे सुमित्रा महाजन यांचे. त्यांनी नकळत आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. पक्षाने आपल्या पालक म्हणून महाराष्ट्रात पाठवावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राहणार की जाणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.