AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगतसिंह कोश्यारी जाणार..? ; त्यांच्यानंतर राज्यपाल पदासाठी ही नावं आली चर्चेत…

काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष काढला. काही दिवसांनी हा पक्ष त्यांनी भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे त्यांचेही नाव महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत आले आहे.

भगतसिंह कोश्यारी जाणार..? ; त्यांच्यानंतर राज्यपाल पदासाठी ही नावं आली चर्चेत...
| Updated on: Jan 28, 2023 | 11:59 PM
Share

मुंबईः सातत्याने महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून केली गेली. त्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदावर ठाम राहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्या नंतर मात्र विरोधकांनी मोर्चा काढून त्यांची राज्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली.

त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपली या पदावर राहण्याची इच्छा नसल्याचे कळवले होते.

त्यामुळे आता नव्या राज्यपालांच्या नावाची चर्चा सुरु आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेल्यानंतर महाराष्ट्राला नवे राज्यपाल कोण लाभणार याकडेच साऱ्यांचे आता लक्ष लागून राहिले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी पंतप्रधान यांच्याकडे केल्यानंतर या पदासाठी आता भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत.

पहिले नाव आहे ओमप्रकाश माथूर यांचेय भाजपचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचे प्रभारी आणि ते भाजपचे सरचिटणीस या पदावरही ते राहिले आहेत. तर दुसरं नावं चर्चेत आहे ते म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे.

राजस्थानच्या राजकारणातील एक मोठं नावं म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे भाजपमध्ये येण्याआधी ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.

त्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष काढला. काही दिवसांनी हा पक्ष त्यांनी भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे त्यांचेही नाव महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी चर्चेत आले आहे.

तर या दोन नावानंतर आता तिसरं एक नाव चर्चेत आले आहे. ते म्हणजे सुमित्रा महाजन यांचे. त्यांनी नकळत आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. पक्षाने आपल्या पालक म्हणून महाराष्ट्रात पाठवावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राहणार की जाणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.