कुठे निवडणुका?, कुठे बिनविरोध; रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट

रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कुठे निवडणुका?, कुठे बिनविरोध; रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:54 PM

रत्नागिरी : जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता जिल्ह्यात 360 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार असून 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर बिनविरोध उमेदवारांची संख्या 1814 आहे. आणि जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतीसाठी 4332 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Grampanchayat Election in Ratnagiri District)

राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून (23 डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. राज्यातील 34 जिल्ह्यांमधील तब्बल 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. आज या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक पक्षांनी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली. त्यात काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी यश आलं नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागात निवडणुका अटळ झाल्या आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची सविस्तर आकडेवारी

राजापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीमध्ये 9 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 41 ग्रामपंचायतीमध्ये एकूण उमेदवार 559 त्यातील 136 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

दापोली तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीमध्ये 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 42 ग्रामपंचायतमधील 99 प्रभागासाठी 459 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या 130 प्रभागात 712 उमेदवार रिंगणात आहेत तर 180 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. तर 12 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

खेड तालुक्यातील 87 ग्रामपंचायतीमध्ये 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून प्रत्यक्ष मतदान 64 ग्रामपंचायतीत होणार असून 685 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत. त्यातील 330 उमेदवार हे बिनविरोध झाले आहेत.

लांजा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीमध्ये 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 19 ग्रामपंचायतीमध्ये 216 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात असून 72 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

गुहागर तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीमध्ये 13 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 16 ग्रामपंचायतीमध्ये 170 उमेदवार रिंगणात असून 152 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तसंच 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

मंडणगड तालुक्यात 15 ग्रामपंचायतीमध्ये एकूण 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाली असून 13 ग्रामपंचायती मध्ये 113 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत.

चिपळूण तालुक्यात 83 ग्रामपंचायती मध्ये 22 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 61 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे.

संगमेश्वर तालुक्यात 81 ग्रामपंचायतीमधील 19 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 62 ग्रामपंचायती मध्ये निवडणूक होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 1949 उमेदवार बिनविरोध झाले असल्याने आता चित्र स्पष्ट झाले आहे.

(Grampanchayat Election in Ratnagiri District)

हे ही वाचा :

बारामती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत, सर्वच 77 उमेदवारांची माघार!

ग्रामपंचायतीसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली; आता प्रचाराचं धुमशान!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.