AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपले सगळे देवी-देवता हिंसक; कालिचरण महाराज यांनी नावांची यादीच सांगितली….

आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यानेच आपण त्यांना पूजा करतो असंही त्यांनी सांगितले. हिंदू धर्मातील देव देवतांन आपल्यासाठी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पूजले असते का असा सवाल त्यांनी केला आहे.

आपले सगळे देवी-देवता हिंसक; कालिचरण महाराज यांनी नावांची यादीच सांगितली....
| Updated on: Dec 25, 2022 | 10:33 PM
Share

मुंबईः राज्यात वेगवेगळ्या गोष्टीवरून राजकारण आणि वाद चालू असतानाच कालिचरण महाराज यांनी ाज एक वादग्रस्त विधान केले आहे. हिंदू धर्मातील देव-देवता हिंसक असल्याचे सांगत त्यांनी खून करणे वाईट नाही जर धर्मासाठी आणि देशासाठी असेल तर असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कालिचरण महाराज यांनी एका जाहीर कार्यक्रमात खून करण्याचं समर्थन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

कालिचरण महाराज एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हिंदू धर्मातील देव देवातांचे दाखल दिले आहेत. ते दाखले देत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंदसिंग महाराज, राणा प्रतापसिंह महाराज यांनी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पुजले असता का असा सवाल त्यांनी आपल्या भक्तांना केला आहे.

आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यानेच आपण त्यांना पूजा करतो असंही त्यांनी सांगितले. हिंदू धर्मातील देव देवतांन आपल्यासाठी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण त्यांना पूजले असते का असा सवाल करून त्यांनी धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असंही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

देशात एकीकडे धर्मावरून वाद वाढत असतानाच कालिचरण महाराज यांनी अशी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्याचे काय पडसाद उमटतील याचीही चिंता व्यक्त केली जात आहे.

कालिचरण महाराज यांनी हिंदू देव-देवतांची नाव घेत असतानाच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचाही उल्लेख त्यांनी हिंसक केला आहे.

तर दुसरीकडे धर्मासाठी आणि देशासाठी खून केले तर काही वाईट असं त्यांनी हत्येचं समर्थन केले आहे. त्यामुळे कालिचरण महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.