AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अदानींना कवडीमोल किंमतीत जमीन, त्यामुळेच तुकाराम मुंढेंची बदली’; वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन अदानींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मोर्चाही निघाला. अशातच याचाच धागा पकडत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलेत.

'अदानींना कवडीमोल किंमतीत जमीन, त्यामुळेच तुकाराम मुंढेंची बदली'; वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
vijay wadettiwarImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 04, 2024 | 10:56 PM
Share

धारावीच्या पुनर्विकासाठी, कुर्ल्यातली सरकारी जमीन कवडीमोल किंमतीनं अदानींच्या घशात घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. कुर्ल्यातील दुग्ध शाळेची साडे 8 हेक्टर अर्थात 21 एकर जमीन अदानींना देण्यात आली. जमिनीची किंमत अंदाजे 20 हजार कोटी रुपये आहे मात्र अदानींना 25 % सवलतीच्या दरानं देण्यात आली. म्हणजेच 20 हजार कोटींची जमीन अवघ्या 5 हजार कोटींना अदानींना देण्यात आली.

10 जूनला एकाच दिवशी जमीन पुशसंवर्धन विभाग, महसूल विभाग ते अदानींना हस्तांतरीत झाली. त्यामुळं कोणाला पैसे दिले ? असा थेट सवाल करत वडेट्टीवारांनी चौकशीची मागणी केलीय. जमिनीच्या हस्तांतरणाबाबत तत्कालीन पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त सचिव तुकाराम मुंढेंनी विरोध केला. त्यामुळंच त्यांची बदली केल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला.

25 % सवलतीच्या दरात ज्या पद्धतीनं एका दिवसात जमीन हस्तांतरणासाठी तत्परता दाखवली. तो जीआरच रद्द करण्याची मागणी वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरेंनी केलीय. तर धारावी पुनर्वसन प्रकल्पात अदानींकडून तब्बल 1 लाख धारावीकरांना अपात्र करण्यात येणार असल्याची भीती आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलीय.

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन अदानींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मोर्चाही निघाला. जगातला सर्वात मोठा टीडीआर घोटाळ्याचा आरोप त्यावेळी ठाकरेंनी केला होता. आता सरकारी जमिन आणि तीही 25 टक्क्यांच्या सवलतीच्या दरात दिल्यानं विरोधक आक्रमक झालेत.

मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....