AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघासाठी इच्छुक संजय निरुपम, पण काँग्रेसकडून या बॉलिवूड अभिनेत्याची चर्चा

Lok Sabha Election 2024 | जागा वाटपावरुन महायुती आणि महाआघाडीत बैठकांचे सत्र सुरु आहे. काही जागांविषयी वाद आहे. प्रत्येक घटक पक्ष संबंधित मतदार संघावर दाव सांगतो. तर अनेक जण या मतदार संघासाठी गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघावरुन पण असाच काहीसा प्रकार समोर येत आहे.

उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघासाठी इच्छुक संजय निरुपम, पण काँग्रेसकडून या बॉलिवूड अभिनेत्याची चर्चा
| Updated on: Mar 07, 2024 | 11:37 AM
Share

अक्षय मंकनी, प्रतिनिधी, मुंबई | 7 March 2024 : तर लोकसभा निवडणुकीचा बिगूल केव्हा पण वाजू शकतो. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाआघाडी असा आमना-सामना पाहायला मिळेल. पण त्यापूर्वी जागा वाटापावरुन खल सुरु आहे. जागा वाटपात काही जागांवर अनेक घटक पक्ष आग्रही आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. पण अजून पूर्ण तोडगा निघाले नसल्याचे समोर येत आहे. उत्तर पश्चिम मुंबईबाबत पण असाच काहीसा प्रकार पाहायला मिळत आहे. अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. तर काँग्रेसने या मतदार संघात आता नवीन चेहरा देण्याचे ठरवल्याची चर्चा सुरु आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेता गोविंदाने या मतदारसंघातून नशीब आजमावले होते. आता काँग्रेसने या दमदार अभिनेत्याचा चेहरा पुढे केला आहे.

आता बदलली सर्वच समीकरणं

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगत आला आहे. आता मात्र समीकरणं बदलली आहे. उद्धव ठाकरे गटाने या जागेवर दावा सांगितला आहे. तर हा मतदार संघ हा भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तीकर हे निवडून आले होते. त्यांनी नंतर ठाकरेविरोधातील बंडात एकनाथ शिंदे यांचा पक्ष धरला. पण ताज्या समीकरणानुसार, हा मतदार संघ शिंदे गटाऐवजी भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संजय निरुपम यांचा दावा

उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात गोविंदाने पण नशीब आजमावले आणि तो विजय पण झाला होता. काँग्रेसकडून अगोदरच संजय निरुपम यांनी या मतदार संघासाठी शड्डू ठोकले आहेत. पण आता काँग्रेस श्रेष्ठींनी दुसरेच नाव पुढे केल्याने निरुपम काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निरुपम यांना दुखवत काँग्रेस पुढे जाणार का असा प्रश्न आहे.

राज बब्बर यांचे नाव केले पुढे

काँग्रेसकडून उत्तर पश्चिम मुंबईतून राज बब्बर यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीच्या उच्चपदस्थांकडून राज बब्बरचं नाव पुढे करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज बब्बर देखील ह्याच मतदारसंघात वर्सोवा येथे राहत असल्याने आणि सेलिब्रिटी चेहरा असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या ठिकाणी विद्यमान खासदार हे गजानन कीर्तीकर हे आहेत पण या जागेवर अगोदरच काँग्रेस चे नेते संजय निरुपम यांनी दावा केला होता. आता कोणात सामना होणार हे लवकरच समोर येईल.

Follow Us
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी.
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय.
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट...
मोठी अपडेट! राहुरीत गोविंद मोकाटेंनी EVM वर व्यक्त केला संशय, थेट....
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
हा लोकशाहीचा नव्हे, मोदी-शहांचा विजय; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल.